election  esakal
नाशिक

सरहदों पर तनाव है क्या, कुछ पता तो करो चुनाव है क्या!

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव (जि. नाशिक) : ‘सरहदों पर तनाव है क्या, कुछ पता तो करो चुनाव है क्या, खौफ बिखरा हैं दोनो सम्तो में, तिसरी सम्त का दबाव हैं क्या’ या शायर राहत इंदोरी यांच्या काव्यपंक्ती सध्या तरुणांकडून ऐकायला मिळत आहे. बऱ्याच ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबल्यामुळे यंदा निवडणूका आहेत की नाही. निवडणूक आयोगाकडून आरक्षणाचा कार्यक्रम कधी जाहीर होईल, त्यासाठीची आरक्षण सोडत कधी जाहीर होईल, या सर्व प्रश्‍नांवर जोरदार चर्चा तरूणांमध्ये सुरू आहे.

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणच्या खोळंबलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागणार आहे. त्यासोबतच जिल्हा परिषद, पंचायत समिती, इतर संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. एकूणच यावर्षी राजकीय फड चांगलेच रंगणार आहेत. आगामी निवडणुकांमुळे राजकीय ईर्षा असलेली तरुण मंडळीही कामाला लागलेली दिसतेय. कोविड कालावधीत निवडणुका झाल्या नसल्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका खोळंबल्या आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायती व जुलैअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत पारावर चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रत्येक गावातील तरुणाईला या निवडणुकांबाबत उत्सुकता असल्याचे चित्र आहे.

अन्य निवडणुकांमध्ये एकत्र असणारी मंडळी गावाच्या राजकारणात मात्र एकमेकांविरूद्ध उभे ठाकतात. नातेसंबंध बाजूला सारत या निवडणुका शब्दशः लढविल्या जातात. आतापर्यंतचा अनुभव विचारात घेता गावातील राजकारणात तरुण वर्गाला फारसा रस नव्हता किंवा इच्छा असूनही त्यांना यामध्ये येणे कठीण होते. अलीकडे मात्र, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढला आहे.

नोकरी, बिझनेस या करिअरच्या गोष्टींचा विचार करणारी तरुणाई आता राजकारणाकडेही करिअरची संधी म्हणून पाहू लागली आहे. निवडणुकीची आपली इच्छा गावपातळीवर पूर्ण करण्याचा पर्याय यातील अनेक तरुणांनी निवडलेला दिसतो. त्यामुळे गावकीचे राजकारण हा बुजुर्ग मंडळींचा असलेला प्रांत तरुणाईनेही काबीज केला आहे. दिवसेंदिवस राजकारणाबाबतची सजगता वाढत आहे. तरुण घराबाहेर पडून संघटन करत आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यापासून उमेदवार विजयी करण्याबाबत सर्व नियोजन सध्या तरुण करत असल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही दिसत आहे.

"तरुण सहजासहजी निवडणुकांपासून कोसोदूर असायचे. तसेच, मतदान करण्यास देखील उत्सूक नसायचे. अनेकवेळा तरुण चेहऱ्यांना संधी मिळत नव्हती. ज्यांना मिळायची त्यांचा राजकीय वारसा असायचा. त्यामुळे सर्वसामान्य नेतृत्व करणारे नाराज होऊन क्षेत्रापासून लांब राहायचे. मात्र, अलीकडच्या काळात त्यामध्ये खूप बदल झाला आहे. गावातील ज्येष्ठांनी आपली ध्येयधोरणे बदलून युवकांना प्राध्यान्य द्यायचे ठरवले, हेही निवडणुकांकडे आकर्षित होण्याचे कारण मानावे लागेल."

- ॲड. नामदेव थोरात, पिंपळगाव (वा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT