election
election  esakal
नाशिक

सरहदों पर तनाव है क्या, कुछ पता तो करो चुनाव है क्या!

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव (जि. नाशिक) : ‘सरहदों पर तनाव है क्या, कुछ पता तो करो चुनाव है क्या, खौफ बिखरा हैं दोनो सम्तो में, तिसरी सम्त का दबाव हैं क्या’ या शायर राहत इंदोरी यांच्या काव्यपंक्ती सध्या तरुणांकडून ऐकायला मिळत आहे. बऱ्याच ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबल्यामुळे यंदा निवडणूका आहेत की नाही. निवडणूक आयोगाकडून आरक्षणाचा कार्यक्रम कधी जाहीर होईल, त्यासाठीची आरक्षण सोडत कधी जाहीर होईल, या सर्व प्रश्‍नांवर जोरदार चर्चा तरूणांमध्ये सुरू आहे.

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणच्या खोळंबलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागणार आहे. त्यासोबतच जिल्हा परिषद, पंचायत समिती, इतर संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. एकूणच यावर्षी राजकीय फड चांगलेच रंगणार आहेत. आगामी निवडणुकांमुळे राजकीय ईर्षा असलेली तरुण मंडळीही कामाला लागलेली दिसतेय. कोविड कालावधीत निवडणुका झाल्या नसल्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका खोळंबल्या आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायती व जुलैअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत पारावर चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रत्येक गावातील तरुणाईला या निवडणुकांबाबत उत्सुकता असल्याचे चित्र आहे.

अन्य निवडणुकांमध्ये एकत्र असणारी मंडळी गावाच्या राजकारणात मात्र एकमेकांविरूद्ध उभे ठाकतात. नातेसंबंध बाजूला सारत या निवडणुका शब्दशः लढविल्या जातात. आतापर्यंतचा अनुभव विचारात घेता गावातील राजकारणात तरुण वर्गाला फारसा रस नव्हता किंवा इच्छा असूनही त्यांना यामध्ये येणे कठीण होते. अलीकडे मात्र, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढला आहे.

नोकरी, बिझनेस या करिअरच्या गोष्टींचा विचार करणारी तरुणाई आता राजकारणाकडेही करिअरची संधी म्हणून पाहू लागली आहे. निवडणुकीची आपली इच्छा गावपातळीवर पूर्ण करण्याचा पर्याय यातील अनेक तरुणांनी निवडलेला दिसतो. त्यामुळे गावकीचे राजकारण हा बुजुर्ग मंडळींचा असलेला प्रांत तरुणाईनेही काबीज केला आहे. दिवसेंदिवस राजकारणाबाबतची सजगता वाढत आहे. तरुण घराबाहेर पडून संघटन करत आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यापासून उमेदवार विजयी करण्याबाबत सर्व नियोजन सध्या तरुण करत असल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही दिसत आहे.

"तरुण सहजासहजी निवडणुकांपासून कोसोदूर असायचे. तसेच, मतदान करण्यास देखील उत्सूक नसायचे. अनेकवेळा तरुण चेहऱ्यांना संधी मिळत नव्हती. ज्यांना मिळायची त्यांचा राजकीय वारसा असायचा. त्यामुळे सर्वसामान्य नेतृत्व करणारे नाराज होऊन क्षेत्रापासून लांब राहायचे. मात्र, अलीकडच्या काळात त्यामध्ये खूप बदल झाला आहे. गावातील ज्येष्ठांनी आपली ध्येयधोरणे बदलून युवकांना प्राध्यान्य द्यायचे ठरवले, हेही निवडणुकांकडे आकर्षित होण्याचे कारण मानावे लागेल."

- ॲड. नामदेव थोरात, पिंपळगाव (वा.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT