Onion crisis
Onion crisis esakal
उत्तर महाराष्ट्र

Onion Crop Crisis : कांद्याने बळीराजाच्या डोळ्यात आणले अश्रू; ठोक बाजारात कवडीमोल भाव!

सकाळ वृत्तसेवा

शहादा (जि. नंदुरबार) : सद्यःस्थितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसल्याने कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. (onion prices fell drastically onion producing farmers were in trouble nandurbar news)

शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला ठोक बाजारात सहा ते सात रुपये किलो कवडीमोल मिळत असल्याने खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांचा तर लागवड खर्चही निघेनासा झाला व त्यानंतर जिल्हाभरात अवकाळी पावसाने व त्यात व्यापाऱ्यांकडून कवडीमोल कांद्याला मिळत असल्याने कांद्याने यंदा शेतकरी पुरता रडकुंडीस आला आहे. शेतकऱ्याने सहा ते सात रुपये किलो या दराने घाऊक बाजारपेठेत विक्री केलेला कांदा सामान्य ग्राहकांना ग्रामीण भागातील आठवडेबाजारात मात्र १५ ते २० रुपये किलो याप्रमाणे खरेदी करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचा तोटा व व्यापाऱ्यांचा फायदा होत आहे.

जिल्हाभरात रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. शेतकऱ्यांनी या वर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली. लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च वजा केला असता कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. कवडीमोलाने विकावा लागत असल्याने त्यांचे आर्थिक गणित चुकले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

कांदा साठविण्याची व्यवस्था असावी

जिथे पिकते तिथे प्रक्रिया उद्योग नसल्याने वाढीव उत्पन्न उत्पादकाला मिळत नाही. शेतकऱ्यांना वाढीव व भरघोस उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी प्रोड्यूसर कंपन्यांनी एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, तसेच कृषी विभागाने साठवणूक गृहासारखी शाश्वत उपाययोजना करावी, अशी मागणी कांदा उत्पादकांकडून करण्यात येत आहे.

लागवडीपासूनच कांद्याला ग्रहण

ऐन लागवडीच्या वेळी महाविरतणने थकीत बिलापोटी शेतातील वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे कांद्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळाले नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. लागवडीपासून कांद्याला लागलेले ग्रहण त्याला मिळणाऱ्या कमी भावापर्यंत कायम असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कांदाचाळ फायदेशीर

जिल्ह्यात शेकडो हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. सरासरी एकरी ३० ते ४० क्विंटल उत्पादन होते. कांद्याला भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी त्याची साठवणूक केल्यास फायदेशीर ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदाचाळ तयार करायला हवी; परंतु त्यासाठी शासनाची योजनासुद्धा शेतकऱ्यांपर्यंत जाणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT