उत्तर महाराष्ट्र

कार्यकर्त्यांचे कौतुक करावे की सांत्वन; राजकीय पुढाऱ्यांसमोर पेच 

जगदीश शिंदे

साक्री : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींचा जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम हा नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणूक बिनविरोध होत, ४० ग्रामपंचायतींसाठीचा मतदानाचा निकाल सोमवारी जाहीर होऊन संपला. मात्र एकाच राजकीय पक्षाचे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या पॅनलमध्ये निवडणुका होताना, गावपातळीवर विजयी होणाऱ्या उमेदवारांचे कौतुक अन् पराभव पत्करणाऱ्या उमेदवाराचे सांत्वन नेमके कसे करावे? हा मोठा पेच तालुक्यातील राजकीय धुरिणांसमोर उभा आहे.

अर्थात, अशी परिस्थिती मतदारांनी दिलेल्या कौलातून समोर उभी ठाकली आहे. यातील वाद व शह-काटशहाचे राजकारण संपुष्टात येत गावाच्या भल्यासाठी पावले उचलली जाण्याची अपेक्षा यानिमित्ताने असली तरी लक्ष्मीदर्शनावर ही निवडणूक गेल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. 

तालुक्यात निजामपूर, जैताने, दुसाने, म्हसदी, मालपूर, कावठे, दिघावे, छडवेल (प.) आदी प्रमुख गावांचा समावेश होता. या गावांतील निवडणुकीचा निकाल अनपेक्षित अर्थात, गावकीवर गेलेला अनुभवास येत असून, झालेल्या मतदानावरून गावकी आणि भावकीच्या वादात माणुसकीचा पराभव होऊ नये, अशी अपेक्षा निवडणूक झालेल्या प्रत्येक गावातील सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रथमच ग्रामपंचायत पॅनल देणाऱ्या विविध पॅनल प्रमुखांनी पक्षश्रेष्ठींचा आधार घेत अमुक एका पक्षाकडून आम्ही निवडणूक लढवत आहोत, असा दावा केला. हा दावा अर्थात, अखेरपर्यंत किती खरा ठरणार? याचे उत्तर काळ देणार असला, तरी राजकीय पदाधिकाऱ्यांकडून संबंधित ग्रामपंचायतीवर आमचेच वर्चस्व, असा दावा करण्यात येत आहे.

यात तालुक्यातील मोठ्या गणल्या जाणाऱ्या निजामपूर ग्रामपंचायतीवर शहर विकास आघाडीचे वर्चस्व असल्याचे चित्र दिसत आहे. तर लागूनच असलेल्या जैताने, मलांजन आणि म्हसदी, अंबापूर, दिघावे ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता असल्याचा दावा होत आहे. तर मालपूर, शेणपूर, महीर, शेवाळी (दा.), ककाणी (भ.), राजबाई-शेवाळी आणि छडवेल (प) या ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आल्याचे चित्र दिसत आहे. 


तालुक्यातील इतर गावांत झालेल्या निवडणुकीत विजयी उमेदवारांवर दावा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले असले तरी, यात तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात तीन पक्ष एकत्र येत प्रभावी ठरणारी महाविकास आघाडी तर इतरत्र भाजपप्रणीत सदस्यांची संख्या अधिक असल्याचा अंदाज आहे. यातील अनेक गावांत यापूर्वी सत्ता असलेल्या धुरिणांना पराभवाचे तोंड पाहावे लागल्याचे चित्र सध्या आहे. तर नवीनच सदस्यरूपी सत्तेपर्यंत पोचणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आपल्या हातून गावविकासासाठी होणाऱ्या कामांवर अधिक भर द्यावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी गावाच्या भल्यासाठी एकत्र येत निवडणुकीतील राग, द्वेष आणि लोभ विसरून गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांना सोबत घेत आपले योगदान द्यावे, अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT