yeola
yeola 
उत्तर महाराष्ट्र

टंचाईप्रश्नी उदासीनता दाखविल्यास अधिकाऱ्यांच्या पगारातून वसुली - सीईओ नरेश गिते यांचा इशारा

सकाळवृत्तसेवा

येवला - तालुका टंचाईगस्त असल्याने सर्वांनी काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात, टंचाईच्या प्रस्तावास ज्या अधिकार्यांनी हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. टंचाईचा प्रस्ताव विहित नमुन्यात वेळेत  सादर न केल्यास त्या गावाला टँकरची गरज भासल्यास टँकरचा सर्व खर्च ग्रामसेवक व संबंधित अधिकार्या्च्या पगारातुन वसुल करणार असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी दिला.

दुष्काळाच्या प्राश्वभूमिवर येथे आज झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार,कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसिलदार रोहिदास वारुळे,माजी सभापती संभाजीराजे पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामसेवक व अधिकार्‍यांनी दक्षता घेऊन पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी ज्या-ज्या उपाय योजना करता येतील, त्या सर्व अवलंब करावा,पाणीटँकरसह दुष्काळाच्या उपाय योजनांचे प्रस्ताव तात्काळ पाठवावे,विंधन विहिरीचे, तात्पुरती नळ जोडणी अशा उपाय योजना तात्काळ हाती घेऊन जिल्हा परिषदकडे पाठवाव्यात. येवला हा दुष्काळग्रस्त असल्यामुळे पाणी टंचाई आणि चारा टंचाई येणार्‍या काळात मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्याचे नियोजन सर्व ग्रामसेवकांनी तात्काळ करावे, अशा सुचना अध्यक्षा सांगळे यांनी केल्या.

अंदरसूलच्या सरपंच विनीता सोनवणे यांनी तात्पुरत्या नळ योजनेसाठी निधीची मागणी केली असता त्यांना ग्रामनिधीतुन कर्ज मंजुरी देण्याचे आश्‍वासन गिते यांनी दिले.पाणी टंचाईसाठी जिल्हा नियोजन मंडळातुन निधी उपलब्ध करुन द्या.पुन्हा भुजल पातळीचा सर्व होऊन वंचित जी गावे राहिली आहे. अशा गावांना शासकीय विहिर योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी संभाजी पवार यांनी यावेळी केली.राजापूर ४३ गाव पाणी पुरवठा योजना शासनाकडे प्रास्तावित केली असून तिचा माणिकपूंज धरणाचा उद्भोद बदलल्यामुळे तो उद्भोद नांदूरमध्यमेश्‍वर केला आहे. ती योजना केंद्र शासनाकडे सादर केली असून याला चालना द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड यांनी केली.त्यावर गिते यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी सुचना दिल्या.गटविकास अधिकारी शेख यांनी तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा मांडला.सभापती नम्रता जगताप, उपसभापती रुपचंद भागवत, सदस्य मंगेश भगत, भाऊसाहेब गरुड, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, कांतीलाल साळवे, बाळासाहेब लोखंडे, शिवसेना तालुकाध्यक्ष रतन बोरनारे,विठ्ठल आठशेरे, दिपक जगताप आदींसह अधिकारी,ग्रामसेवक-सरपंच उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT