on the road From Chalisgaon to Dhule 580 pits
on the road From Chalisgaon to Dhule 580 pits  
उत्तर महाराष्ट्र

अबब! २२ किलोमीटरच्या रस्त्यावर ५८० खड्डे

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अत्यंत रहदारीचा असलेल्या महामार्ग क्रमांक २११ वरील चाळीसगाव ते धुळे पर्यंतच्या रस्त्याची दोनच वर्षांत अक्षरशः वाट लागली आहे. या रस्त्यावरील दहिवड फाटा ते चाळीसगावपर्यंत २२ किलोमीटरच्या अंतरावर लहान मोठे तब्बल ५८० खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची रुंदी एक मीटरपेक्षा जास्त असल्याने वाहनचालकांना वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. केवळ खड्डयांमुळेच लहानमोठे अपघात होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
या रस्त्याचे नव्याने काम दोन वर्षापूर्वी झाले होते. या कामाची संबंधित ठेकेदाराने पाच वर्षांपर्यंतची वॉरंटी दिलेली होती. मात्र, त्याआधीच रस्ता खराब होत चालला आहे. मेहुणबारे ते चाळीसगावपर्यंतच्या १५ किलोमीटरवर ४८० खड्डे सद्यःस्थितीत आहेत. सध्या या भागात पाऊस होत असल्याने खड्डे आणखीनच त्रासदायक ठरत आहेत. नागरिकांची वाहने नादुरुस्त होणे, खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्याच्या खाली वाहन जाणे, अपघात होणे असे प्रकार जणू नित्याचे झाले आहेत.

खड्ड्यांमुळे होताहेत अपघात
चाळीसगाव- धुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविताना कुठून चालवावे, असा प्रश्‍न चालकांना पडलेला असतो. या महामार्गावरील खडकीसीम फाट्याजवळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात कुंझर (ता. चाळीसगाव) येथून अंत्यविधी आटोपून रात्री साडेआठच्या सुमारास कजगाव (ता. भडगाव) येथील साहेबराव पाटील यांची दुचाकी आदळल्याने त्यांचा अपघात झाला होता. ज्यात दोघे जखमी झाले होते. याच ठिकाणी एका तासाने तिरपोळे (ता. चाळीसगाव) येथील तरुणाचा अपघात झाला होता. रविवारी (१ सप्टेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास मनोज गायकवाड हे दुचाकाने (क्रमांक- एम. एच. १९ सीडी ९३३७) चाळीसगावहून मेहुणबारेकडे जात असताना हॉटेल वर्षा जवळच्या वळणावर खड्डे टाळण्यासाठी मागच्या वाहनाने त्यांना हूल दिली. ज्यात श्री. गायकवाड हे थोडक्यात बचावले होते. एकूणच हा रस्ता जीवघेणा होत चालल्याने दुरुस्तीची मागणी होत आहे.

वाहनचालक म्हणतात.....
दुरुस्तीला मुहूर्त कधी सापडणार?
सतीश पाटील (भऊर, ता. चाळीसगाव): या रस्त्यावर वाहन चालवताना बऱ्याचदा खड्डे टाळण्याच्या नादात समोरून येणारे वाहन आपल्या अंगावर येत की काय असे वाटते. केवळ खड्ड्यांमुळे अनेकांना पाठ, मान व कमरेचे विकार जडत आहेत. खड्ड्यांमुळे अपघातही वाढले आहेत. संबंधित विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त कधी सापडणार?

ठेकेदारावरच कारवाई करावी
प्रशांत पवार (धामणगाव, ता. चाळीसगाव): दोन वर्षांपूर्वी हा रस्ता नव्याने तयार करण्यात आला होता. आता त्यावर सर्वत्र खड्डे पडू लागल्याने ते बुजण्याची साधी तसदी कोणी घेत नाही. खड्ड्यांमुळे अनेकदा वाहनांचे नुकसान होते. ज्यामुळे आम्हाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. ज्या कोणी या रस्त्याचे काम केले त्या ठेकेदारावरच कारवाई करावी.

जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते
मनोज गायकवाड (चाळीसगाव): या रस्त्यावरून चाळीसगाव ते मेहुणबारे असे आमचे दररोज येणे जाणे होते. रस्त्यावरील लहान असलेले खड्डे आता इतके मोठे झाले आहेत, की वाहन चालविताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालवावे लागते. दुचाकी चालविताना खड्ड्यांमुळे ती घसरेल की काय अशी भीती असते. त्यामुळे तातडीने खड्डे तरी बुजले पाहिजे.

रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या आठवड्यात नागपूर विभागाकडे सादर केला जाईल. तेथून त्याला मंजुरी मिळताच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल.

- हितेश अग्रवाल, अभियंता: राष्ट्रीय महामार्ग विभाग, धुळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT