sarpanch 1.jpg
sarpanch 1.jpg 
उत्तर महाराष्ट्र

भोळ्या ग्रामस्थांना फसवून सरपंचांनी केली 'अशी' हेराफेरी..उपसरपंचाकडून पर्दाफाश 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बहिराणे (ता. बागलाण) येथे शासनाकडून राबविलेल्या घरकुल योजनेंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत सरपंचांनी वैयक्तिक बॅंक खात्यातून रक्कम आपल्या वैयक्तिक खात्यात वर्ग केल्याची लेखी तक्रार लाभार्थ्यांनी बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. गोरगरीब आदिवासी बांधवांना न्याय मिळावा, यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका उपसरपंचांनी घेतली आहे. 

बॅंकेच्या कागदावर अंगठे घेऊन स्वतःच्या बॅंक खात्यात रक्कम
काटवन खोऱ्यात महड- बहिराणे गट ग्रामपंचायत आहे. अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मोफत घरकुल बांधून दिली जातात. त्यानुसार आदिवासी भिल्ल समाजातील घरकुल लाभार्थी असलेल्या पांडू मोरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की यंदा घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतीत प्रकरण दाखल केले होते. त्यानंतर प्रकरण मंजूर झाल्याने टेंभे येथील महाराष्ट्र बॅंकेच्या वैयक्तिक खात्यात शासनाकडून १५ हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र, सरपंच भाऊसाहेब धोंडगे यांनी माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन बॅंकेच्या कागदावर अंगठे घेऊन स्वतःच्या बॅंक खात्यात रक्कम वर्ग केली. 

आदिवासी बांधवांची फसवणूक करून आर्थिक गैरव्यवहार 
याबाबत उपसरपंच मधुकर सोनवणे, माजी उपसरपंच गुलाब अहिरे यांनी सांगितले, की महड येथील अप्पा गायकवाड यांच्या घरकुलच्या खात्यातूनही सरपंचांनी 15 हजार रुपये, तर सुक्राम मोरे यांच्या खात्यातून 45 हजार रुपयांची रक्कम काढून आदिवासी बांधवांची फसवणूक करून आर्थिक गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे दोषी असलेल्या सरपंचांवर आर्थिक फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच ग्रामपंचायत विभागाने सर्व घरकुल लाभर्थ्यांची पडताळणी करावी, अशी मागणी उपसरपंच मधुकर सोनवणे, माजी उपसरपंच गुलाब अहिरे यांनी केली आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT