water
water 
उत्तर महाराष्ट्र

पाणीपुरवठा योजनेतून पाच वर्षांत पाचच महीने पाणी

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : राजमाने (ता.चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  गंभीर बनला आहे.गेल्या पाच वर्षांत पाणीपुरवठा योजनेचे पाच महीनेच पाणी मिळाले आहे.  गावातील हातपंप बंद असून 'ते' 'शोपीस' ठरले आहेत.पाणी प्रश्न न सुटल्यास महिलांसह सर्व ग्रामस्थांनी उपोषणाला बसण्याचा  इशारा दिला आहे.

कळमडु ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या राजमाने गावातील महीलांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागतआहे. या गावातील ग्रामस्थांच्या नशिबी असलेली पाण्याची भटकंती कधी थांबेल ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

2013 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर राजमाने येथीव  ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.त्यावेळी त्यांचा तात्पुरता पाणीप्रश्न सोडवण्याचा  काही राजकीय पदाधिकारी यांनी केविलवाणा प्रयत्न केला होता. असा आरोप  ग्रामस्थांनी केला आहे.त्यावेळी पंधराच दिवसात पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आजही पुन्हा तशीच वेळ राजमाने येथील ग्रामस्थावर आली आहे.सध्या येथील गावाची सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ही जिल्हा परिषदेच्या उपविभाग पाचोरा यांच्याकडुन 1 आॅक्टोबंर 2017 ला कळमडु ग्रामपंचायतीच्या ताब्यात मिळाली आहे.आता त्यांना या योजनेचे वीजवितरण कंपनीकडून नविन कनेक्शन घ्यायचे असुन त्यांच्या नावाची बिलाची रक्कम जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने वीजवितरण कंपनीला भरलेली  नाही. त्यामुळे त्यांना नविन विजेचे  कनेक्श मिळण्यास  आडचणी येत आहेत.जिल्हा  परिषद जोपर्यंत पैसे भरत नाही तो पर्यंत कळमडुकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

हातपंप ठरले 'शो' पीस
राजमाने गावातील पाणीटंचाई काळात उपयोगी पडणारे चार  हातपंप तेरा महीन्यापासुन नादुरुस्त असल्याने बंद पडले आहेत.उन्हाळ्या पुर्वीच्या हातपंपाची दुरूस्ती करणे गरजेचे होते.मात्र आज या गावातील पाणीटंचाई काळात जर एखादा हातपंप चालु राहीला असता तर महीलांना गावातच पाणी मिळाले असते.
हातपंपासाठी जमिनीत टाकण्यात येणाऱ्या पाईपची मर्यादा दोनशे फुटापर्यंत असते.तरी या चारही हातपंप लवकरात लवकर दुरूस्त करावे आशी मागणी महीलांमधुन होत आहे.

बातमीनंतर सोशल मीडियावर चर्चा!
'सकाळ'च्या बातमीनंतर आज सोशल मीडियावर पाणी प्रश्न चांगलाच पेटला. सकाळने प्रकाशित केलेली बातमी ट्विटरसह, व्हाट्सऍपवर चांगलीच व्हायरल झाली. ट्विटरवर राजमानेतील पाणी टंचाईवर प्रशासनाप्रति संताप व्यक्त केला गेला. शिवाय तातडीने पाणी प्रश्न न सुटल्यास उपोषणाचा देखील इशारा देण्यात आला.

राजमाने गावातील हातपंप दुरूस्ती संदर्भात आम्ही प्रशासनाकडे फी देखील भरली आहे.येथील बंद असलेले हातपंप चालु करण्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.  
- कविताबाई पाटील , सरपंच कळमडु (ता.चाळीसगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT