akshay-prakash-yojana
akshay-prakash-yojana 
उत्तर महाराष्ट्र

अखेर विखरणीच्या अक्षय प्रकाश योजनेला मिळाला मुहूर्त

सकाळवृत्तसेवा

येवला - आंदोलने, निवेदने, ऊर्जा मंत्र्यांकडे बैठका असा मोठा पाठवूरावा केल्यानंतर तीन वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतर विखरणी येथील अक्षय प्रकाशच्या कामाला मुहूर्त मिळाला. शुक्रवारी (ता.६) या कामाला सुरुवात झाली असून, मे पर्यत हे काम मार्गी लागणार आहे. यामुळे या विद्युत उपकेंद्रातून परिसरातील गावांना सिंगल फेज वीजपुरवठा सुरु होणार आहे. या कामासाठी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. २०१४ मध्ये छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून विखरणी येथे विद्युत उपकेंद्र सुरु करण्यात आले. मात्र या उपकेंद्रातून परिसरातील सहा गावे कायमस्वरूपी अंधारात असल्यामुळे हे उपकेंद्र सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. विखरणी उपकेंद्रा अंतर्गत विखरणी, विसापूर, कातरणी, आडगाव रेपाळ, मुरमी, कानडी ही गावे असून, रात्रीचा वीजपुरवठा होत नसल्याने सर्व गावे गेल्या तीन वर्षापासून अंधारात होती. 

अक्षय प्रकाश योजनेंतर्गत या सहाही गावांना वीजपुरवठा करण्यात यावा यासाठी अनेकदा आंदोलनासह उपोषणाही करावे लागले होते. तसेच सब स्टेशन सुरु होण्याच्या वेळेस अक्षय प्रकाश योजनेसह सब स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे म्हणून ग्रामस्थांनी मोहन शेलार यांच्या नेतृत्वाखाली या उपकेंद्राला टाळेही ठोकले होते. आमदार जयंत जाधव यांनी हा प्रश्न कायमचा निकाली निघावा म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर हा प्रश्न मांडून यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. अखेर या सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत एसडीटी रोहीत्र या कामासाठी मंजूर करण्यात येऊन या कामाचा शुभारंभ करण्यात आला. 

येत्या एक महिन्यात हे काम पूर्ण करून लाभधारक सहा गावे उजेडात येतील अन याचा आनंद सगळ्यात जास्त मला होईल अशी प्रतिक्रिया मालेगाव विभागाचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता सुरेश जाधव यांनी दिली. या कार्यक्रम प्रसंगी उपकार्यकारी अभियंता निलेश कोळी, सहाय्यक अभियंता गणेश चौधरी, मच्छिंद्र दराडे, राजवाडे, शिवाजी उशीर, नामदेव पगार, श्रावण वाघमोडे, बाबासाहेब ठोंबरे, जालिंदर शेलार, राजेंद्र शेलार, अरुण खरे, दयानंद खरे, मोतीराम आहीरे, अशोक बंदरे आदीसह सहाही गावातील नागरिक उपस्थित होते 

"मागील तीन वर्षापासून सतत पाठपुरावा, उपोषणासह आंदोलनही करावे लागले. काम सुरु झाल्याने सहा गावाचा प्रश्न मार्गी लागत असल्याने समाधान आहे. लोकप्रतिनिधी म्हणून भुजबळ साहेबांची उणीव वेळोवेळी जाणवली."
- मोहन शेलार,सदस्य पंचायत समिती येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT