Jaya Bachchan attack on BJP Jaya Bachchan attack on BJP
Uttar Pradesh Assembly Election 2022

जया बच्चन यांचा भाजपवर हल्ला; योगी-मोदी यांनी राजकारण सोडून...

सकाळ डिजिटल टीम

१५ वर्षांपासून महिलांच्या सुरक्षेसाठी काम करीत आहे. महिला सुरक्षेबाबत योगी सरकारने केलेले दावे पोकळ आहेत. भाजपचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. भाजप फक्त शहरे आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचे काम करीत आहे. मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकारणाशी संबंध नाही. त्यांनी झोपडीत जावे, असा हल्ला सपा नेत्या व राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी केला. (Jaya Bachchan attack on BJP)

शनिवारी (ता. २६) मडियाहून आणि मच्छलीशहर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशला एक्स्प्रेस वेचा रस्ता दाखवला. ते लोकांच्या हृदयावर राज्य करीत आहे. जया यांनी मच्छलीशहरमध्ये त्यांच्या निधीतून महिलांच्या सुरक्षेसाठी सल्लागार कक्ष सुरू करण्याचे आश्वासन दिले. मंचावरूनच त्यांनी अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये झालेल्या विकासकामांवर कविता ऐकवली.

भाजपला (BJP) कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावे लागेल असे दिसते. सपाचे सरकार आल्यास पाच वर्षे मोफत रेशनसोबत तेल-तूप देऊ. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण आणि २२ लाख नोकऱ्याही देण्यात येणार आहेत. महिलांचे पेन्शन १,८०० रुपये प्रति महिना केले जाईल. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलात महिलांची भरती केली जाईल, असे माजी खासदार डिंपल यादव (Dimple Yadav) म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT