8 acres of horticulture farm in Hirapur
8 acres of horticulture farm in Hirapur 
विदर्भ

हिरापुरात 8 एकर बागायती शेती 

डिलेश्वर पंधराम

गोरेगाव : तालुक्यातील हिरापुर येथील उच्च शिक्षीत शेतकरी सुरेन्द्र (बब्लु) बिसेन यांनी नोकरी सोडुन सन 2000 पासुन पारंपारीक भात शेतीला सुरुवात करुन धान मळणी यंत्र, 1 ट्रॅक्टर विकत घेतला त्यासाठी सुरेंद्र बिसेन यांनी बँकेतुन 25 लाखाचे कर्ज घेतले हा तालुक्यातील पहीला यांत्रीक शेतीचा प्रयोग होता. सन 2007 मध्ये 7 एकर शेतीत ऊसाची लागवड केली. या पिकापासुन धानापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले सन 2015 पासुन ऊसाच्या शेतीबरोबर 8 एकर शेतीत बागायती शेती करण्यासाठी कूषी विभागाकडे धाव घेतली या विभागाला बागायती शेतीचे पुरेशी माहीती नसल्याने त्यांनी मार्गदर्शन केले नाही. मनात जिद्द असल्याने पश्चिम महाराष्टातील बागायतदार शेतकऱयांची भेट घेवुन माहीती मिळविली. बागायती शेती ही शेंद्रीय शेती असावी यासाठी त्यांनी 6 दुधारी गायी विकत घेतल्या, शेतात 1 विहीर, 1 बोरवेल तयार करुन डीप पद्धतीने गोमुत्र व पाणी देण्याला सुरुवात केली व शेणखताचा प्रयोग सुरु केला 4 एकर शेतीत अनार व 4 एकर शेतीत मोसंबी, दाळ निंबु ची लागवड केली. 

कूषी विभागाने बागायती शेती विषयी मार्गदर्शन करावे यासाठी तालुका कूषी अधिकारी, जिल्हा कूषी अधिकारी यांच्याकडे बिसेन यांनी धाव घेतली परंतु याकडे कूषी अधिकारी यांनी दुर्लक्ष केले. जिल्हात हिरापुर या गावी बागायतदार शेतकरी आहे. असी माहीती जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांना माहीती होताच त्यानी दोनदा या बागायती शेतीला भेट देवुन झाडे कसी लावावी त्याचे अंतर कित्ती असावे या सुटलेल्या जागेत आंतरपीक घ्यावे असी माहीती दिल्याने बिसेन यांनी शेतीची मशागत केली कूषी विभाग तंत्रज्ञान, शासकीय अनुदानाची माहीती देत नाही. तसेच अतीवूष्टी, वादळी वारे यापासुन बागायती शेतीला नुकसान झाले. तर कूषी सेवक, तलाठी, ग्रामसेवक यांना नुकसानीचा माहीती अभावी पंचनामा करता येत नाही. धानाला हमीभाव देण्यात येतो.

पण बागायती शेती पिकांना हमी भाव नाही, शासनाने बागायती शेंद्रीय शेती बाजारपेठ सुरु करावी, शितगूह बांधावे हे उपलब्ध नसल्याने भाव मिळत नाही मोसंबी, अनार हे पीक नागपुरला विकण्यास न्यावे लागते हा खर्च परवडणारा नसल्याने उत्पन्नात घट होत आहे या करीता राष्टीय बागवाणी बोर्ड नागपुर,जिल्हा कूषी अधिकारी, बँक यांनी सहकार्य करण्याची गरज आहे शेतकरी पारंपारीक भात शेती करतो त्यामुळे आर्थिक अडचनीत असतो त्यामुळे बँकेचे कर्जपरतफेड करु शकत नाही त्यामुळे बँका बागायतदार शेतकरी यांना कर्ज देत नाही आर्थिक मदतीशिवाय शेतकरी  शेती करु शकत नाही जिल्हात बागायती शेतीला वाव देणे गरजेचे आहे असी माहीती शेतकरी सुरेन्द्र बिसेन यांनी दिली
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT