accident on amravati to chandur railway line, both killed
accident on amravati to chandur railway line, both killed 
विदर्भ

अमरावती-चांदूररेल्वे मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर

संतोष ताकपिरे

अमरावती : अमरावती ते चांदूररेल्वे मार्गावरील बासलापूर फाट्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर, महिलेसह एक चिमुकला असे दोघे गंभीर जखमी झाले. आशिष चंद्रकांत काकडे (वय ३६, रा. रामनगर, वर्धा) व अनिल सुधाकर मेश्राम (वय ३२, रा. शिवणी रसुलापूर, नांदगावखंडेश्वर) अशी अपघातातील मृतांची नावे असल्याचे पोलिस निरीक्षक मगन मेहते यांनी सांगितले. 

अपघातात काकडे यांच्या पत्नी राणी आशिष काकडे (वय २८) व मुलगा शिवांश आशिष काकडे (वय ३ वर्षे, रा. रामनगर, वर्धा) हे जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (ता. २३) दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. काकडे कुटुंबीय एमएच २७ एडब्यू १४५७ क्रमांकाच्या दुचाकीने अमरावतीवरून वर्धेला तर, अनिल मेश्राम हे एमएच ३२ व्ही ४६०७ क्रमांकाच्या दुचाकीने चांदुररेल्वे वरून अमरावतीकडे येत होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडे यांची दुचाकी रॉंग साइडने होती. तर मेश्राम योग्य दिशेने येत होते. दोन्ही दुचाकी वेगात असल्याने जोरदार धडक झाली. त्यात दुचाकीवरील सर्वच जण दूर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यापैकी श्री. मेश्राम यांचा जागेवरच मृत्यू झाला. काकडे दाम्पत्यासह चिमुकल्यास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

येथे उपचारादरम्यान श्री. काकडे यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. अपघातात दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला. प्रकरणी चांदुररेल्वे पोलिसांनी वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली. असे पोलिस निरीक्षक श्री. महते यांनी सांगितले. 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT