accident news vidarbha two killed in truck accident yavatmal esakal
विदर्भ

ट्रकने चिरडल्याने दोघांचा मृत्यू, तीन जखमी

तीन मजूर जखमी : पुनवट गावाजवळील घटना

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : रस्त्याची डागडुजी करणार्‍या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना पुनवट गावाजवळ बुधवारी (ता.चार) दुपारी पाच वाजता दरम्यान घडली. वणी ते चंद्रपूर मार्ग आयव्हीआरसीएल या बांधकाम कंपनीने तयार केला आहे. मात्र निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने या सिमेंट रोडवर मोठं मोठ्या भेगा पडल्या आहे. त्यामुळे या मार्गावर दुचाकीस्वारांचे नेहमीच अपघात होतात. सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडल्याने त्या भेगा बुजवण्याचे काम सुरू  केले आहे.

पुनवट गावाजवळ रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. वणीकडून भरधाव येणार्‍या ट्रकने राजू मिलमीले (वय 27, रा. कोठोडा), धर्माजी भटवलकर (वय 65, रा. बेलोरा), सुरेश जुनगरी (वय 40, रा. बेलोरा, सतीश गेडाम (वय 35, रा. बेलोरा), पांडुरंग अवताडे (वय 30, रा. कोठोडा) या पाच मजुरांना चिरडले. यात राजू मिलमीले, धर्माजी भटवलकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रक चालक फरार झाला. जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिरपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT