akola farmer
akola farmer 
विदर्भ

 109 शेतकऱ्यांचा गळ्याला फास!

सुगत खाडे

अकोला : घरात अठराविश्व दारिद्र्य अन् मायबाप सरकाराचं दुर्लक्ष अशाच निसर्गाचं संकट पाचविलाच पुजलेलं... या आणि अशा अनेक संकटातून मार्ग काढावा तर कसा याच विवंचनेत अडकेल्या जिल्ह्यातील तब्बल 109 शेतकऱ्यांनी या वर्षात अकाळीच मृत्यूला कवचाळले आहे. हा आकडा केवळ अकरा महिने पंधरा दिवसाचा असून अद्याप वर्षही उलटले नाही आहे. त्यानंतर सुद्धा ही भयावह स्थिती सरकारसह शासकीय यंत्रणेला दिसत नसेल तरच नवल.

शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादन दिसत असले तरी शेतमालाचे खर्चाला न परवडणारे दर, नापिकी व इतर कारणांमुळे त्रस्त झालेले शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहेत. 2015 मध्ये शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आकडा दोनशेजवळ पोहचला होता. त्यानंतरच्या वर्षांत सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दीडशेच्या खाली पाहायला मिळाले नाही.

गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस व शेतमालाचे चांगले उत्पादन होते. त्यानंतर सुद्धा दर अडीच दिवसाआड एक शेतकरी आत्महत्येची घटना घडली. शेतकरी आत्महत्याचे हे आकडे बघून शेती व शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असल्याचे लक्षात येते. दरम्यान यावर्षी पावसाने सर्वत्र थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यावर शासनाने जाहीर केलेली मदत सुद्धा तोडकी असल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


अशा झाल्या शेतकरी आत्महत्या
2019 च्या जानेवारी महिन्यात 8, फेब्रुवारीत 9, मार्च 6, एप्रिल 8, मे 10, जून 9, जुलै 17, ऑगस्ट 15, सप्टेंबर 12, ऑक्टोबर 12, नोव्हेंबरमध्ये (आतापर्यंत) 3 शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जाचा डोंगर व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्या आहेत. त्यासोबतच 2001 ते 2015 पर्यंत एक हजार 766, 2016 ते 2017 या वर्षात 361 व 2018 या वर्षात 142 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.


आत्महत्येचे पाळेमुळे बिघडलेलं आर्थिक गणितं
साडे अकरा महिन्यात झालेल्या 109 शेतकरी आत्महत्यांच्या मागील कारणांचा विचार केला तर त्यामागे बिघडलेली आर्थिक गणित हे एकमेव कारण दिसून येईल. जुलै महिन्यात सर्वाधिक 17 आत्महत्या पेरणीच्या तोंडावर झाल्या असून पेरणीसाठी लागलेला खर्च उभारता न आल्यामुळे बळीराजाने टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून येते. तर ऑक्टोबर महिन्यात दसरा व दिवाळी या दोन सणांच्या काळात सर्वाधिक 12 आत्महत्या झाल्या आहेत. तेव्हा कौटुंबिक, आर्थिक अडचणी याच आत्महत्येचे प्रमुख कारण दिसून येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT