पातूर (जि. अकोला) : शाळा आणि घंटा हे समिकरण नवीन नाही. शाळेत घंटा वाजणारच. मग त्यात नवल तरी काय? पण अकोला जिल्ह्यातील पातूर या तहसील मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या एका शाळेत चक्क पाणी पिण्यासाठी घंटा वाजविली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासोबत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.
शाळा म्हटले की रटाळ पुस्तकी ज्ञान, असेच चित्र आपल्या पुढे उभे राहते. कॉन्व्हेंट संस्कृती आल्यानंतर मुलांच्या अदर ॲक्टिव्हिटी वाढल्यात. पण ग्रामीण भागातील शाळांपर्यंत अद्याप हा बदल हवा त्या प्रमाणात पोहोचलेला नाही. याला पातूर येथील कॉन्व्हेंट अपवादच म्हणावी लागेल. या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासाचा विकास करून वेगवेगळे उपक्रम राबविले जाता. अर्थातच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा. त्यामुळे या शाळेत चक्क मुलांना पाणी पिण्याचे महत्त्व कळावे व त्यांनी वेळोवेळी पुरेसे पाणी प्यावे, या उद्देशाने पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलमध्ये पाण्याची घंटा वाजविली जाते.
निरोगी आयुष्यासाठी पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. वयानुसार पाणी किती प्यावे याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार पातुरच्या किड्स पॅराडाईजने विद्यार्थ्यांना माहितीपत्रक वाटप केली आहेत. शाळेत विद्यार्थी पाणी कमी पितात अशा अनेक तक्रारी पालकांकडून सातत्याने होतात. पालकांची त्यांच्या पाल्यांबाबतची चिंता लक्षात घेताल शाळेने त्याने त्यावर उपाय शोधून काढला आहे. किड्स पॅराडाईजच्या संचालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी अभिनव उपक्रमाची जोड देण्याचा निर्णय घेतला.
पालकांमध्येही जनजागृती
शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व सचिव ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये शाळेच्या वेळेत तीन वेळा पाण्यासाठी घंटा वाजविण्यात येते. शाळेच्या वेळापत्रकातच त्याची नोंद करण्यात आली आहे. घंटा वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण स्वतः शिक्षिका करून देणार आहेत. पाणी पिण्याचे महत्त्व सांगणाऱ्या चित्रफीत, पोस्टर्स, माहिती पत्रक विद्यार्थ्यांना दिले जात आहे, वाचून दाखविले जात आहे. पालकांनासुद्धा याबाबत सूचना देऊन त्यांच्या पाल्याने किती पाणी प्यायला हवे याबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
यांचा या अभिनव उपक्रमात सहभाग
शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्याचे महत्त्व पटवून देण्याच्या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, प्रगती टाले, सुषमा इनामदार, भाग्यश्री तुपवाडे, नितू ढोणे, सविता वानखडे, सुलभा परमाळे, सुलभा तायडे, पूनम फुलारी, दिपाली गौतम, शीतल कवडकर, तुषार नारे, गायत्री बराटे, अर्चना अढाऊ, बजरंग भुजबटराव, सै. वकार, प्रणाली उपर्वट, शुभम पोहरे, रुपाली पोहरे, अनुराधा उगले आदींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.