akola Improved timing of lockdown is a problem for farmers 
विदर्भ

लॉकडाउनची सुधारित वेळ शेतकऱ्यांसाठी अडचणीची

सकाळ वृत्तसेेवा

संग्रामपूर (जि.बुलडाणा) ः सुधारित लॉकडाउन ची वेळ शेतकऱ्यांना शेती साठी लागणारे साहित्य, खते, औषध खरेदी करताना मोठी अडचणीची ठरू पाहत आहे. कारण ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्याची शेतात जाण्याची वेळ सकाळी 8 वाजताच्या दरम्यान असते. तर दुपार नंतर म्हणजे 4 ते 5 वाजताचे दरम्यान घरी येतात. ही वेळ पाहता खत किंवा औषध करावे तरी कधी?. असा प्रश्न निर्माण होत असल्याने याकडे पालकमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज दिसत आहे.


जिल्ह्यात 7 जुलै पासून कडक लॉकडाउन सुरू झाल्याने कृषी केंद्र ही अत्यावश्‍यक सेवेतून वगळण्यात आले आहेत. आता नवीन नियमावली नुसार कृषी केंद्र सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत खुले ठेवण्याचे स्थानिक प्रशासनाने सूचित केले आहे. वास्तविक पाहता ही वेळ शेतकऱ्यांसाठी मोठी अडचणीची ठरत आहे. सद्यस्थितीत कपाशीला खते देणे कीडनाशक फवारणी चा सिझन सुरू आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी औषध अथवा खत घरी नेऊन ठेवण्या ऐवजी हातोहात दुकानातून शेतात घेऊन जातात. सकाळी शेतात गेल्यानंतर संध्याकाळी घरी येण्याची वेळ असल्याने खत किंवा औषध खरेदि कशी करावी . असा प्रश्न निर्माण होत आहे. या कडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्याच्या सोयीचा विचार करून वेळे मध्ये सुधारणा करावी अशी मागणी होत आहे.

नवीन आलेल्या आदेशानुसार 7 जुलै पासून तालुक्‍यात दुपारी 3 नंतर फक्त मेडिकल स्टोअर्स आणि दवाखाना सोडून कूठलेही दुकाने सुरू राहणार नाहीत.
-समाधान राठोड,तहसीलदार, संग्रामपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT