ऍड. प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देताना समतादूत.
ऍड. प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देताना समतादूत.  
विदर्भ

बार्टीच्या समतादूतांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

जितेंद्र सहारे

चिमूर (चंद्रपूर) : समाजातील वंचित घटकाच्या सक्षमीकरणासाठी राज्यघटनेने दिलेले अधिकार, शासनाच्या विविध योजनांची माहिती व फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार बार्टीच्या समतादूत प्रकल्पाद्वारे जनजागृतीच्या माध्यमातून समाजात पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे. याचा लाभ उपेक्षित वंचित घटकांना मिळत होता. मात्र. शासनाने समतादूत प्रकल्प बंद करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प बंद झाल्यास राज्यातील 447 समतादूतांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
राज्यात फुले, शाहू, आंबेडकर यांचे स्वातंत्र्य, समता, बंधुताचा पुरोगामी विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून शोषित, वंचितापर्यंत पोहोचविण्याच्या कार्याला 2015 रोजी सुरवात झाली. राज्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून चारशे सत्तेचाळीस समतादूत कार्यरत आहेत. चार वर्षांच्या कालावधीत समतादूतांनी गावखेड्यात थोरसंत, समाजसुधारक यांच्या विचारांबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून सामाजिक न्याय विभागांतर्गत येत असलेल्या योजना, महिला सक्षमीकरण, ऍट्रॉसिटी ऍक्‍टबद्दलची माहिती, जनजागृती व प्रबोधनाच्या माध्यमातून शोषित, वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य समतादूतांनी केले. विधवा, परितक्‍त्या, अपंग, महिला कलावंतांचाही सर्वे समतादूतांनी केले आहे. योग्य पद्धतीने काम सुरू असतानाच हा प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीला चाप बसणार असल्याची खंत समतादूतांनी व्यक्त केली आहे. बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता समतादूत प्रकल्प बंद न करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी समतादूत प्रज्ञा राजूरवाडे, मंजूषा मडके, प्रीती मेश्राम, राष्ट्रपाल डोंगरे, प्रार्थना दिवे, वर्षा करेंगुलवार, रजू मेंढुलकर यांची उपस्थिती होती.

सामाजिक न्याय विभागाशी चर्चा करणार ः ऍड. प्रकाश आंबेडकर
समाजातील वंचित घटकांपर्यंत फुले, शाहू, आंबेडकर यांचा समतेचा विचार पोहोचला पाहिजे. समाजात थोर समाजसुधारकांच्या विचारांची जनजागृती झाली पाहिजे. एवढा मोठी जनजागृती समतादूताच्या माध्यमातून होत असताना समतादूत प्रकल्प बंद करण्यामागे कोण आहे, याचा शोध घेण्यात येईल. समतादूत प्रकल्प बंद होऊ नये, यासाठी बार्टी व सामाजिक न्यायविभागाशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT