bacchu kadu 
विदर्भ

...तर चार दिवसांचा आठवडा करून टाका, असे का म्हणाले राज्यमंत्री बच्चू कडू?

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना आता शनिवार-रविवार सुट्टी असणार आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज (ता. १२) पार पडली. या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा असेल. अनेक दिवस प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमवबजावणी करण्यात येईल.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून पगार देण्यात यावा
मागील अनेक वर्ष राज्य सरकारचे कर्मचारी प्रतिनीधी पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी पाठपुरावा करत होते. मात्र, काही ना काही अडचणींमुळे हा निर्णय होऊ शकला नव्हता. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.  

या निर्णयावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मात्र काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारी कर्मचार्यांना पाच दिवसांचा आठवडा असेल तर मग पगार सात दिवसांचा कशाला ? असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे.


सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून करून पगार देण्यात यावा, तसेच पदानुसार पगार देण्यापेक्षा कामानुसार पगार देण्यात यावा असेही ते म्हणाले. एवढेच नाही तर जे अधिकारी इमानेइतबारे काम करतात त्यांना चार दिवसांचा आठवडा केला तरी हरकत नाही. सर्वांच्या कामाचे मूल्यमापन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT