सेवाग्राम : विचार व्यक्त करताना अभिनेत्री अलका कुबल; मंचावर रामजराजे स्वराचार्यजी ऊर्फ माऊली महाराज, खासदार डॉ. विकास महात्मे आणि इतर मान्यवर
सेवाग्राम : विचार व्यक्त करताना अभिनेत्री अलका कुबल; मंचावर रामजराजे स्वराचार्यजी ऊर्फ माऊली महाराज, खासदार डॉ. विकास महात्मे आणि इतर मान्यवर 
विदर्भ

शेतकरी अन्नदाता असल्याची जाणीव ठेवा : अभिनेत्री अलका कुबल 

सकाळ वृत्तसेवा

सेवाग्राम (जि. वर्धा) : आपला देश कृषिप्रधान आहे आणि शेतकरी हा अन्नदाता आहे, याची प्रत्येकाला जाणीव असावी. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी निःस्वार्थ मनाने राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता महात्मा गांधी निर्धार पदयात्रा काढून समाजात नवचैतन्य निर्माण केले आहे, असे मत अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केले. 

या पदयात्रेमध्ये शेतकरी मार्गदर्शन, स्वच्छतेचा संदेश, प्रबोधन करण्यात आले. स्वच्छता अभियान ही काळानुसार गरज आहे. युवकांनी या अभियान सहभागी व्हावे, असे आवाहन अलका कुबल यांनी केले. 

सेवाग्राम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गांधी संकल्प पदयात्रेचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून अलका कुबल बोलत होत्या.

यावेळी रुख्मिणी विदर्भ पीठाधीश रामजराजे स्वराचार्यजी ऊर्फ माऊली महाराज, खासदार डॉ. विकास महात्मे, जिल्हा परिषदेचे सभापती विजय आगलावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्‍याम कार्लेकर, शोभा तडस, सरपंच सुजाता ताकसांडे, संतोष महात्मे, जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे आदींची उपस्थिती होती. 

स्वच्छता राखणे आमची जबाबदारी 

15 जानेवारीपासून गुरुकुंज (मोझरी) येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. पाच दिवसांत ही यात्रा सेवाग्राम येथे पोहोचली. रविवारी (ता. 19) सेवाग्राम येथे समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी बोलताना खासदार डॉ. विकास महात्मे म्हणाले, सभोवतालची स्वच्छता राखणे ही आमची जबाबदारी आहे. 

सफाई कामगारांचा सन्मान झाला पाहिजे 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. त्यांच्या प्रेरणेने काम पुढे घेऊन जायचे आहे. त्यामळे सफाई कामगारांचा सन्मान झाला पाहिजे. पाच दिवसात या पदयात्रेमध्ये ग्रामीण भागातून उत्तम प्रतिसाद मिळाला. 

जाणून घ्या : विवाहसोहळ्यातून त्या शेतकरी कुटुंबांना मिळाला आधार

शेतकरी आणि बुद्धिवान व्यक्‍ती देशाची शक्ती 

पीठाधीश रामराजे स्वराचार्यजी म्हणाले, संपूर्ण देशाला प्रेरणा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महापुरुषांनी नेहमी खऱ्या मार्गाने चालण्याचे सांगितले. समाजाला चांगली दिशा दिली. शेतकरी आणि बुद्धिवान व्यक्‍ती देशाची शक्ती आहे. पिकांवर शेतकरी कीड प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषधांची फवारणी करतो, तशी वाईट विचारावर फवारणी करून चांगले विचार आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

कार्यक्रमाचे संचालन सुनीता महात्मे यांनी केले. यावेळी ग्रामीण महिला, पुरुष, शेतकरी युवकांचा सत्कार करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT