BJP Leaders Detained Amravati Stone Pelting Case
BJP Leaders Detained Amravati Stone Pelting Case E sakal
विदर्भ

अमरावती दगडफेक प्रकरण : भाजप शिष्टमंडळाला घेतले ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर येथे झेंडा काढण्याच्या वादातून दोन गटामध्ये तुफान राडा झाला. यामध्ये दगडफेक (Amravati Achalpur Stone Pelting) देखील करण्यात आली. त्यानंतर भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अचलपूर आणि परतवाड्याकडे जाण्याच्या तयारी होते. पण, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

दगडफेकीची घटना घडल्यानंतर भाजपचे पदाधिकारी अचलपूर आणि परतवाड्याकडे जायला निघाले होते. पण, पोलिसांनी अचलपूर येथे जाण्यापासून त्यांना रोखले. त्यांना ताब्यात घेऊन आसेगाव पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती आहे.

नेमकं प्रकरण काय? -

अचलपूर आणि परतवाडा शहरात तसेच देवमाळी व काढली भागात रविवारी रात्री रस्त्यावर जमाव उतरला होता. झेंडा काढण्यावरून दोन गटात राडा झाला. पोलिसांनी रुट मार्च काढून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. जमाव शांत होत नसल्याचे पाहून पोलिसांनी अश्रूधुरांचा वापर केला. त्यानंर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. आणखी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आदेश अचलपूर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी १६ जणांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन कंपन्या तैनात करण्यात आला आहे. याशिवाय मुख्यालयाच्या पोलिस दलासह अकोला पोलिसांनाही अचलपूर आणि परतवाड्यात तैनात करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT