live in 
विदर्भ

दोघेही राहत होते "लिव्ह-इन'मध्ये अन्‌ उचलले टोकाचे पाऊल... 

सकाळ वृत्तसेवा

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील पती-पत्नीने गळफास लावून बुधवारी (ता. 27) आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. हे दोघेही मृतक पती-पत्नी नव्हते. चार वर्षांपासून ते "लिव्ह-इन'मध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आत्महत्येचे गूढ आणखी वाढले आहे. 

देबाशीष रॉय (वय 40) आणि शशीकिरण टोपो (वय 32) या दोघांनी बुधवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हे दोघे पती-पत्नी असल्याचे सांगितले गेले. मात्र, पोलिस तपासात त्यांचे लग्नच झाले नसल्याचे समोर आले. देबाशीष कोलकाता आणि शशीकिरण छत्तीसगडची रहिवासी होती. त्यांनी निर्मल बॅंग शेअर मार्केटिंग कंपनीची शाखा अडीच वर्षांपूर्वी घुग्घुस येथे सुरू केली होती. सोबतच शशीकिरण शिवणकामसुद्धा शिकवायची. कोरोना संकटाच्यापूर्वी त्यांच्या शेअर बाजारातील गुंतवणूक चांगली सुरू होती. मात्र, टाळेबंदीत त्यात मंदी आली. निर्मल बॅंग कंपनीत गुंतवणूक केलेल्या अनेकांची रक्कम कमी झाली. या दोघांवर कर्ज होते. ते टाळेबंदीत वाढतच गेल्याची माहिती आहे. त्यातच बुधवारी अचानक या दोघांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली. 

घटनेपूर्वी घरमालकाने नेली होती मोटारसायकल

ते घुग्घुस येथील श्‍लोलेम गोस्पल चर्चचे मागील तीन वर्षांपासून सदस्य होते. घुग्घुस येथील साहानी कॉम्प्लेक्‍स फ्लॅटमध्ये ते भाड्याने राहायचे. त्या फ्लॅटचा मालक प्रवीण कोंकटी यांनी घटनेच्या आदल्या दिवशी 26 मे रोजी देबाशीषची दुचाकी नेली होती. दुसऱ्या दिवशी 27 मे रोजी दुपारी 12.30 दुचाकी परत करण्यासाठी कोंकटीने देबाशीषच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधला. परंतु दोघांकडूनही उत्तर मिळाले नाही. कोंकटीने अनेकदा या दोघांच्याही भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढून त्यांना उत्तर मिळत नव्हते. शेवटी 1.30 वाजता घुग्घुस पोलिसांना याची माहिती त्यांनी दिली. दोन वाजता पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आतील दृश्‍य बघून तेही हादरले. देबाशीष आणि शशीकिरण यांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. 

सूत्रानुसार दोन दिवसांपूर्वीच देबाशीषने घुग्घुस येथील एका हार्डवेअर दुकानातून नायलॉनची दोरी आणि फर्निचरच्या दुकानातून स्टुल विकत घेतला होता. पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली. त्यात "आम्ही चूक केली. परंतु मदत करायला कुणीच समोर आले नाही. त्यामुळे हा निर्णय घेत आहे. आम्हाला माफ करा' असे लिहिले होते. त्यामुळे ती "चूक' नेमकी कोणती. ती चिठ्ठी त्यांनीच लिहिली आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत. त्यांच्या घरातून तीन भ्रमणध्वनी जप्त केले आहे. यातूनच या आत्महत्या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात या दोघांचेही कुणीही नातेवाईक नाही. या दोघांच्याही नातेवाइकांना पोलिसांनी याची माहिती दिली आहे. दोघांचेही नातेवाईक येईपर्यंत शवविच्छेदन होणार नाही. मृतदेह शवागारात ठेवले आहे. सध्या पोलिस या दोघांचेही "कॉल डिटेल्स' तपासात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT