भंडारा : पूरग्रस्त भागातील शेतीची पाहणी करताना केंद्रीय पथकाचे सदस्य.  
विदर्भ

साहेब, पुरामुळे आम्ही खचून गेलो आता सरकारने करावी मदत...केंद्रीय पथकासमोर पूरग्रस्तांची विनवणी

दीपक फुलबांधे

भंडारा : पुरामुळे भंडारा जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या पथकाने जिल्ह्यातील भंडारा, पवनी व लाखांदूर तालुक्यां‍तील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधला. साहेब, पुरामुळे आम्ही खचून गेलो. होते नव्हते तेही पुराने हिरावून नेले. आता मायबाप सरकारने आमची मदत करावी, अशी विनवणी पूरग्रस्त नागरिकांनी केंद्रीय पथकाकडे केली.

नागपूरचे कृषी संचालक आर. पी. सिंग, केंद्राचे ग्रामविकास विभागाचे उपसचिव एस. एस. मोदी, महेंद्र सहारे यांचा केंद्रीय पथकात समावेश आहे. या पथकाने भंडारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहेत. जिल्हाधिकारी संदीप कदम, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार साहेबराव राठोड, पवनीच्या तहसीलदार नीलिमा रंगारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, अरुण बलसाने व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

शेतीसह जनावराचे मोठे नुकसान

शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी पुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती पथकातील सदस्यांना दिली. जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा व्यक्त केली. पुरामुळे घरांचे, शेतीचे, गोठ्यांचे, जनावरांचे व कोंबड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. बेला-कोरंबी रस्त्यावरील ९१० मीटर रस्ता पुरामुळे वाहून गेला. या रस्त्याची पाहणी पथकाने केली. त्याचप्रमाणे घर, शेती व गोठ्यांचे पंचनामेसुद्धा तपासले.

पथकाने केली शेतकऱ्यांशी चर्चा

पिंडकेपार येथील सेवकराम साठवणे या शेतकऱ्याशी चर्चा केली. पिंडकेपार येथील धानाचे पूर्णतः नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर भंडारा तालुक्‍यातील खमाटा येथील शेती, घर व तलावाच्या नुकसानाची पाहणी करून पथकाने शेतकऱ्यांशी चर्चा केली. मत्स्यशेतीचेसुद्धा पुरामुळे नुकसान झाल्याचे खमाटा येथील शेतकऱ्यांनी सांगितले. पूर्णतः व अंशतः पडलेल्या घरांची या पथकाने पाहणी केली.

नागरिकांनी मांडल्या व्यथा

पवनी तालुक्‍यातील पौना खुर्द हे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले होते. या गावातील घरांची व गोठ्यांची पाहणी पथकाने केली. नदीच्या काठावर असलेल्या पौना गावातील नागरिकांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या. गावातील नुकसानाचे सर्व पंचनामे झाले असून तातडीची मदत वाटप सुरू झाल्याचे तहसीलदार नीलिमा रंगारी यांनी सांगितले.

नुकसानाचा अहवाल केंद्राला सादर करणार

इसापूर येथील धान शेतीचे नुकसान झालेल्या विजय हरिश्‍चंद्र वाणी यांच्या शेताची पथकाने पाहणी केली. सहा एकरातील संपूर्ण पीक खराब झाल्याचे शेतकऱ्यानी सांगितले. भंडारा तालुक्‍यातील पिंडकेपार, खमाटा या गावांना भेटी देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानाचा सविस्तर अहवाल लवकरच केंद्र शासनाला सादर करणार असल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT