विदर्भ

जनतेशी संपर्क व संवाद महत्वाचा : 'एडीजीपी' बिष्णोई

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जनतेशी संपर्क व त्यांच्याशी सुसंवाद हा महत्वाचा असून, याबाबत प्रत्येक पोलिस ठाणे प्रभारीनी सतर्कता बाळगली तर कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास मदत होते. तसेच महोत्सव शांततेत व गुण्यागोविंदाने पार पडू शकतो, असे मत राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (आस्थापना) संदिप बिष्णोई यांनी व्यक्त केले. 

नांदेड परिक्षेत्रातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावे, यासाठी पोलिस विभागाला काही सुचना व बंदोबस्तस्थिती पहाण्यासाठी ते शनिवारी (ता. आठ) दुपारी जिल्हा दौऱ्यावर होते. पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकप्रतिनिधी, नागरिक व सर्वसामान्य जनतेच्या सहभागाने यावर्षीचा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करणे, मनुष्यबळ उपलब्ध करणे आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे, यासाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.

नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना त्यांनी माहिती दिली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना सर्वसामान्य जनता, गणेशोत्सव समित्या, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, शांतता समितीचे सदस्य यांच्या संपर्कात राहून बैठका घेणे व त्यांना याबाबत अवगत करणे महत्वाचे ठरणार आहे. शहरातील सीसीटीव्ही या काळात चालू ठेवून कुठेही अप्रीय घटना घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

वेगवेगळ्या गणेशोत्सवाच्या ठिकाणी लावण्यात येणारे देखावे याबाबत देखील पोलिसांनी व संबंधित यंत्रणेने सतर्क राहून त्याबाबत काळजी घ्यावी. त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना होणार नाही, याबाबत देखील सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती काळजी घेण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT