crops
crops 
विदर्भ

खरिपानंतर आता रब्बीवरही अवकाळीचे संकट

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : तालुक्यातील रब्बी हंगामावर अवकाळी पावसाचे संकट दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत नऊ हजार हेक्टर पर्यत रब्बी पिकाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडे आहे. यामध्ये गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांचा समावेश आहे.

यंदा पावसाळा भरपूर व तालुक्यात जलयुक्त शिवार अंतर्गत खोलीकरणाची कामे झाली असल्याने पाणी अडविण्याचे प्रमाण वाढले. परिणामी, तालुक्यात भूगर्भातील पाण्याची पातळी गत वर्षी पेक्षा वाढलेली दिसत आहे. म्हणून प्रथमच यंदा रब्बी पीक लागवडसाठी शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. खरिपात अतिपावसाने हाती आलेले सोयाबीन पीक खराब झाले. कपाशी ला ही झटका बसला. यातून सावरण्यासाठी रब्बीचा हंगाम साथ देईल असे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे संकट उभे राहले आहे. 

अवकाळी पावसाची हजेरी
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण अवकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावली. यामुळे कोवळ्या अवस्थेत असलेली कांदा रोपे, गहू, हरभरा सह इतर पिकांवर दुष्परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असताना शेती व्यवसायात रिक्स घेऊन मशागतीसाठी महागडा खर्च करून रब्बीची आशा असलेल्या शेतकऱ्याचे संतुलन बिघडत आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना धीर देणे गरजेचे दिसत आहे. 

शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी
खरीप हंगामातील मदत व पीक विमा अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतांना दिसत नाही. यासाठी संबंधित प्रशासनाची दिरंगाई शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाची मालिका नव्या वर्षात ही शेतकऱ्यासाठी कायमच दिसत असल्याने आर्थिक विकासाचा प्रश्न निर्माण होत आहे. बदलत्या वातावरणामध्ये कृषी विद्यापीठ अथवा विज्ञान केंद्र आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देणे गरजेचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

SCROLL FOR NEXT