हिंगणी (जि. वर्धा) : वारंवार तक्रारी करूनही पाटबंधारे विभागाने कालव्याच्या वितरिकेची दुरुस्ती केली नाही. शेवटी मुसळधार पावसात धामणगाव शिवारातील वितरिका फुटल्याने पावसाचे पाणी शेतात शिरले. पाण्यामुळे शेतातील कपाशीचे पीक आणि सुपीक माती खरडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
नानबर्डी, डोंगरगाव धरणाच्या मुख्य वितरिकेची गत 15 वर्षांपासून डागडुजी केली नाही. शेतकऱ्यांनी याबाबत संबंधित विभागाला वारंवार माहिती दिली; पण दुर्लक्षच करण्यात आले. धामणगाव मौजात असलेली ही वितरिका पावसाच्या पाण्यामुळे फुटली. या वितरिकेत इतर शेतातील पाणी आले. ते वितरिकेच्या बाजूने असलेल्या पाटचऱ्या नादुरुस्त असल्याने वितरिकेतील पाण्याने शेतातून मार्ग काढला. यात शेतातील कपाशीचे पीक व माती खरडून गेली. यात मंगेश काळे यांचे तीन एकर शेतातील पिकाचे नुकसान झाले. यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. त्यांच्या शेतालगत असलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसानीला सामोरे जावे लागले.
शेतकरी काळे यांनी सेलू येथील उपकार्यकारी अभियंता यांना लेखी तक्रार दिली; परंतु त्यांनी बोरधरण येथे तक्रार देण्यास सांगितले. पंधरवडा लोटूनही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीला भेटसुद्धा दिली नाही. पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.