farmer loss
farmer loss Sakal
विदर्भ

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान; सर्वेक्षण कासवगतीने

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - नैसर्गिक आपत्ती अंतर्गत अमरावती विभागातील पीकविमा योजनेचे केवळ ३५ टक्केच सर्वेक्षण झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना विमा परतावा कधी मिळेल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोला व अमरावती या दोन जिल्ह्यांतील टक्केवारी चांगली असली तरी बुलडाणा, वाशीम व यवतमाळ येथील सर्वेक्षणाची टक्केवारी चिंताजनक आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती विभागात एकूण १९ लाख १३ हजार १७८ शेतकरी आहेत. त्यापैकी १२ लाख ९९ हजार ७०२ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नुकसान झाल्याची सूचना ७२ तासांत ३ लाख ७० हजार ४१५ शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने विमा कंपनीने १ लाख २७ हजार ८९२ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले आहे. तब्बल २ लाख ४२ हजार ५२३ शेतकऱ्यांच्या सूचनांवर अजूनही कंपनीने सर्वेक्षण केलेले नाही. विभागातील सर्वेक्षणाची सरासरी फक्त ३५ टक्के इतकी दयनीय आहे.

परतावा देण्यासाठी कंपनीच्या कामाची गती सर्वेक्षणाच्या सरासरीवरून दिसून येते. या गतीने बाधित शेतकऱ्यांना विमा परतावा कधी मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळीपूर्वी परतावे मिळावे, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र कृषी विभाग व कंपनीचा कारभार बघता, ती शक्यता फारच कमी आहे.

जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा प्राप्त पूर्वसूचना सर्वेक्षण टक्केवारी

बुलडाणा ११७८३४ १२९८४ ११

अकोला ५५८४४ ५२२०० ९३

वाशीम ९०२९० १६८३६ १९

अमरावती २५१६० २०४५८ ८१

यवतमाळ ८१२८७ २५४१४ ३१

-----------------------------------------------------------------------

३,७०, ४१५ १,२७८९२ ३५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT