Agriculture sakal
विदर्भ

ई-पीक नोंदणीची मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत

राज्य सरकारने सुरू केलेल्या ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांकडून नैसर्गिक आपत्तीमुळे थंड प्रतिसाद आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - राज्य सरकारने सुरू केलेल्या ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांकडून नैसर्गिक आपत्तीमुळे थंड प्रतिसाद आहे. 15 सप्टेंबर ही अंतिम मुदत होती, ती आता 15 दिवसांनी वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांना एक संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान तांत्रिक कारणांमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणीकडे पाठ फिरवणे सुरू केले आहे.

15 ऑगस्टला शुभारंभ झालेल्या ई-पीक पाहणी मोहिमेस शेतकऱ्यांकडून थंड प्रतिसाद मिळाला. त्यामागे पावसाची रिपरिप, शेतातील चिखल व इंटरनेट कनेक्शन न मिळणे कारणीभूत ठरले आहेत. सद्या जिल्हाभर पाऊस कोसळत आहे. शेतात जाणारी वाट चिखलमय बनली आहे. शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी प्रत्यक्ष शेतात जाऊन करायची आहे. पिकांचे छायाचित्र अपलोड करायचे आहे. ज्या अ‍ॅपमध्ये ही सर्व नोंदणी करायची आहे ते तासन् तास बीझी आहे. एकाचवेळी या अ‍ॅपवर विविध ठिकाणांहून नोंदणी होत असल्याने सर्व्हरवरील ताण वाढला आहे. परिणामी एका शेतकऱ्याला नोंदणीसाठी दीड ते दोन तासांहून अधिक वेळ लागत आहे. अखेर कंटाळून तो नोंदणी करणे सोडून देऊ लागला आहे.

ई नोंदणीला प्रारंभी सकारात्मक प्रतिसाद होता, तो आता नकारात्मक रूप घेऊ लागला आहे. 11 सप्टेंबरपर्यंत अमरावती जिल्ह्यात 7 लाख 21 हजार 481 सातबारापैकी 1 लाख 11 हजार 308 म्हणजे सरासरी 25 टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली. नोंदणीची ही टक्केवारी बघता 15 सप्टेंबर ही मुदत वाढविण्यात आली असून, नोंदणी आता 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. पंधरा दिवस अतिरिक्त देण्यात आले असले तरी तांत्रिक अडचणी मात्र राज्य सरकारने सोडविलेल्या नाहीत. पावसाची रिपरिप काही भागांत सुरूच आहे. शेतात सध्या चिखल आहे, तो तुडवत शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे. यादरम्यान सर्व्हर गतीमान करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

काय आहेत अडचणी?

* सातत्याने सुरू असलेला पाऊस

* शेतात जाण्याची वाट चिखलमय

* इंटरनेट कनेक्शन नाही

* अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईलची वानवा

* सर्व्हरवरील ताण वाढलेला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT