solder.jpeg 
विदर्भ

आधी ‘तो’ जवान लढला कोरोनासोबत; भारत-चिन सीमेवर तणाव निर्माण होताच निघाला कर्तव्यावर

सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि.बुलडाणा) : कोरोना या शब्‍दाने सध्या अख्खे विश्‍व हादरले आहे. एका विषाणूमुळे अनेकांच्‍या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशात अनेक जण आहेत जे की, कर्तव्‍य तत्‍परतेने आपल्‍या जीवाची पर्वा न करता दिवस रात्रं सेवा देत आहेत. यामध्ये एक नाव आहे खामगाव येथील वैभव लक्ष्मणराव वनारसे. ते सध्या आयटीबीपी या सैन्‍यदलात कार्यरत असून, स्‍वतःवर आलेल्‍या कोरोनाच्‍या संकटाला हरवून लेह लद्दाख येथे सेवा देत आहेत.

सध्या देशात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, या संसर्गाला रोखण्यासाठी शासनाच्‍यावतीने विविध उपाययोजना अंमलात आणल्‍या जात आहेत व राबविण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर आहे. त्‍यामुळे डॉक्‍टर, पोलिस कर्मचारी हे आपला जीव धोक्‍यात घालून आपले कर्तव्‍य पार पाडतांना दिसून येत आहेत. देशातील लोकांच्‍या आरोग्‍याची काळजी जसे डॉक्‍टर घेत आहेत. त्‍याचप्रमाणे देशाच्‍या सुरक्षेसाठी सैन्‍यदलातील जवान देखील आपले कर्तव्‍य पार पाडत आहेत. येथील चिंतामणी मंदिराजवळील रहिवासी असलेले वैभव वनारसे हे आयटीबीपी या भारतीय सैन्‍यदलात कार्यरत आहे.

त्‍यांना देखील कोरोना आजाराने ग्रासले होते. मे महिन्‍याच्‍या 25 तारखेला त्‍यांचा रिपोर्ट पॉझिटिव्‍ह आल्‍याने त्‍यांच्‍यावर उपचार सुरू होते. दरम्‍यान, 9 जून रोजी 14 दिवसांच्‍या उपचारानंतर त्‍यांची प्रकृती सुधारली असून, त्‍यांनी प्रकृती सुधारताच कोणतीही सुटी न घेता. त्‍यांनी ते कर्तव्‍यावर असलेल्‍या भागातील तणावाची परिस्‍थिती पाहता कर्तव्‍यावर रुजू होण्यास   प्राधान्‍य दिले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या प्रखर देशभक्‍तीचा येथे परिचय आला आहे. जिथेे लोक आजारापासून स्‍वतःला वाचविण्यासाठी घरात बंदीस्‍त झालेले असताना वैभव वनारसे यांचा निर्णय किती धाडसी आहे हे यावरुन दिसून येते.

वैभव वनारसे हे 2013 साली सैन्‍यदलात भरती झाले असून, 2018 पासून ते लेह लद्दाख येथे सेवा देता आहेत. सध्या भारत-चीन या दोन देशांमध्ये तणावाची परिस्‍थिती आहे हे माहिती असून, सुध्दा वनारसे यांनी देशसेवेला प्राधान्‍य दिल्‍याने त्‍यांच्‍या या निर्णयाचे कौतुक होत आहे. कोरोना आजारासंदर्भात सांगताना ते म्‍हणाले की, हा संसर्गजन्‍य रोग असल्‍याने धोका जास्‍त आहे. परंतु यापासून बचाव करण्यासाठी शासनाने दिलेल्‍या उपायोजनांचे पालन केल्‍यास यापासून नक्‍कीच बचाव होतो.

कर्तव्‍याला प्राधान्‍य
आम्‍ही सिमेवर असतो, त्‍यामुळे संपूर्ण देशवासी निश्‍चित होवून सर्वत्र वावरत असतात. सध्या देश मोठ्या संकटात आहे. त्‍यामुळे कोरोना आजारातून बरा झाल्‍यावर सुटी घेवून आराम करण्याच्‍या पर्यायाला न निवडता कर्तव्‍याला प्राधान्‍य दिले.
- वैभव वनारसे, जवान, आटीबीपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT