नागपूर: पंचायत समितीमध्ये आलेले हरदोली शाळेतील विद्यार्थी व पालक.  
विदर्भ

शाळा बंद करू नका होऽऽ

गुरुदेव वनदुधे

पचखेडी (जि  नागपूर): गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा संपणार नाहीत असे चित्र पुन्हा समोर आले आहे. कुही तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त हरदोली येथील विद्यार्थी आमची शाळा बंद करू नका, असा टाहो फोडत पंचायत समितीवर धडकले. हरदोलीच्या शाळेत 22 विद्यार्थी असताना त्यांना पुनर्वसित बोरी शाळेत स्थानांतरित केल्याचा विरोध करण्यासाठी पालकांसह विद्यार्थी पंचायत समितीमध्ये विनंती करण्यासाठी पोहचले.
कुही तालुक्‍यातील हरदोली नाईक या गावाचे पुनर्वसन लागूनच असलेल्या बोरी येथे केले. मात्र योग्य मोबदला व पुनर्वसनाचा प्रश्‍न कायम असल्याने अद्याप हरदोलीमधील 60 टक्के नागरिकांनी मूळ जागा सोडलेली नाही. मूळ गाव हरदोली येथे आजही अनेक सोयी आहेत. त्यात गावातील शाळेचाही समावेश आहे. या शाळेत 22 विद्यार्थी शिकतात. मात्र, हरदोलीचे पुनर्वसन झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे असल्याने येथील शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. येथील सर्व विद्यार्थी बोरी येथील शाळेत स्थानांतरित करण्यात आल्याचे प्रशासनाने आपल्या वतीने जाहीर केले. हरदोलीचे पुनर्वसन असलेल्या बोरी येथील शाळेत केवळ 10 ते 12 विद्यार्थी आहेत. प्रशासनाने हेतुपुरस्सर पुनर्वसितांच्या मुलांना शिक्षणच द्यायचे नाही या हेतूने शाळा बंद करून प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केल्याची भावना हरदोलीच्या नागरिकांत निर्माण झाली आहे. शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार शिक्षणाची शासनाची जबाबदारी असताना गावठाणातील शाळा बंद करून कायद्याला केराची टोपली दाखविल्याचा आरोप नागरिकांनी केला. शाळा बंद करू नये ती सुरू ठेवावी, अशी विनंती पालकांसह विद्यार्थ्यांनी कुही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT