विदर्भ

येत्या निवडणुकीत अनाचार आणि भ्रष्ट्राचाराला गाडून टाका : प्रा.नरेंद्र खेडेकर

सकाळवृत्तसेवा

चिखली : आज सर्वत्र अनाचार आणि भ्रष्ट्राचार बोकाळलेला आहे. देशात, राज्यात आणि चिखली विधानसभा मतदारसंघातही हीच परीस्थिती आहे. स्थानिक राजकारण्यांवर नाव न घेता हल्ला चढवितांना जनतेला विकासाच्या बाता मारुन सत्तेत बसलेल्यांनी जनतेच्या पैश्यावरच डल्ला मारला आहे. अश्या अनाचार, भ्रष्ट्राचार करणार्‍या रावणी प्रवृत्तींना येत्या 2019 च्या निवडणुकांमध्ये पराभूत करुन राजकीय व्यवस्थेमधून गाडून टाका असे आवाहन शिवसेना नेते आणि जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केले.

स्थानिक जिल्हा सहकारी बँकेच्या पाठीमागील मैदानावर प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या पुढाकारातून विजयादशमीच्या निमीत्ताने गुरुवारी (ता.18) सायंकाळी साडेसहा वाजता रावण दहन आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये उपस्थित नागरीकांना संबोधीत करतांना प्रा. नरेंद्र खेडेकर बोलत होते.

यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष मदनराजे गायकवाड, तहसिलदार मनिष गायकवाड, ठाणेदार गुलाबराव वाघ, सहकार अधिकारी राजेंद्र घोंगे, माजी नगराध्यक्ष सलीम मेमन, प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेकेपाटील, पत्रकार समाधान गाडेकर, संजय खेडेकर, पवन लढ्ढा, शिवसेनेचे निलेश अंजनकर, रोहीतदादा खेडेकर, माजी उपाध्यक्ष श्रीराम झोरे, नगरसेवक दत्ता सुसर, डॉ.प्रकाश शिंगणे, नंदु कर्‍हाडे, मनोज नगरीया, दत्ता देशमुख, विलास घोलप, सखाराम भुतेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलतांना खेडेकर यांनी रावण दहनाच्या विरोधात आवाज उठवितांना आधी हे लक्षात घेतले पाहीजे की, रावण हा कोणत्याही जातीधर्माचा किंवा व्यक्ती म्हणून त्याचे दहन करण्यात येत नाही तर रावण ही एक वाईट प्रवृत्ती म्हणून आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक म्हणून रावण दहन केले जाते. मात्र या विरोधामागेही काहीतरी वेगळेच कारण काढून काही मंडळी हा विरोध करीत असल्याचे ते म्हणाले. 

शिवसेनेचे प्रखर हिंदुत्वाच्या मुद्यावर पुढील वाटचाल करणार असल्याचे सांगुन राम मंदीराच्या नावावर मते मागीतली, निवडणुका लढविल्या, जिंकल्या आणि सत्ता मिळविली तरीही राममंदीराची एकही वीट आजवर लागली नाही असे सांगून केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही राम मंदीर उभारता येत नसेल तर कोणत्या तोंडाने हा निवडणुकीचा मुद्दा बनविला अशी घणाघाती टिका भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी केली. यापुढे राममंदिरासाठी शिवसेना अधिक आक्रमक होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात सध्या सर्वत्र अत्यल्प पावसामुळे शेतकर्‍यांचे खरीपाचे पिक पुर्णपणे गेलेले आहे, रब्बी पिकांची कोणतीही आशा दिसत नाही अश्यात राज्य सरकारने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ दुष्काळ जाहीर करुन मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केली. येत्या 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने शिवसेनेला पाठींबा द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे रवी पेटकर, मनिष दर्डा, समाधान जाधव, शुभम खेडेकर, अक्षय खेडेकर यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि शिवराणा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT