Bank.jpg
Bank.jpg 
विदर्भ

येथील अर्थचक्र गतीमान...जाणून घ्या ते कसे

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हात २० एप्रिलपासून काही प्रमाणात संचारबंदी शिथील करुन उद्योग, व्यवसाय सुरू करण्याबाबतचे निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यामुळे निश्चितच जिल्ह्यात आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्या अनुषंगाने बँकेच्या सर्व सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने बँकेत सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया यांनी केले आहे.

देशात कोरोना विषाणूचा अचानक प्रादूर्भाव वाढल्याने सुरक्षेच्या दृष्टीने २२ मार्चपासून सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले होते. जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक सुविधा सुरू ठेवून इतर उद्योग, व्यवसाय, बंद करण्यात आले होते. बँका, शासकीय कार्यालयांमध्येही पाच टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवून कामे सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे बँकेचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात ठप्प झाले होते. मात्र २० एप्रिलपासून काही अटीशर्तीच्या अधिन राहून काही प्रमाणात संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय गतीमान झाले असून, इतरही आर्थिक उलाढालीचे कामे काही प्रमाणात सुरू झाली आहेत. बँकांद्वारे सुद्धा सर्व सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. परंतु, नागरीकांनी कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून व्यवहार करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेनीया यांनी केले आहे.

बँकेचे सर्व व्यवहार सुरू
बँकेच्या सर्व सुविधा उपलब्ध असून, व्यवहार सुरू आहेत. बँक व्यवहार करताना लागणारी कागदपत्रे, सुविधा देणारी कार्यालये, यंत्रणा मात्र आतापर्यंत सुरू नसल्याने, संबंधित व्यवहार होऊ शकत नव्हते. ३ मे नंतर मात्र बहुतांश सुविधा सुरू होणार असल्याने, बँकेतही सर्व सेवा प्रदान करण्यात येतील. परंतु, प्रत्येकाने ऑनलाइन, डिजीटल व्यवहार करण्यावर भर द्यावा. जेणेकरुन संसर्गाची भीती राहणार नाही, आर्थिक व्यवहार सहज होतील व बँकेत सुद्धा गर्दी होणार नाही.
- आलोक तारेनीया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला

निकषांची पूर्तता केल्यास पीक कर्ज मिळेल
जिल्ह्यात सर्वच बँकेत पीक कर्ज वितरण सुविधा सुरू आहे. फक्त पीक कर्ज घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना बँकेच्या निकषाणूसार कागदपत्र्यांची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे, आलोक तारेणीया यांनी सांगितले.

चिंता ३ मे नंतरची
देशभरात ३ मे नंतर लॉकडाउन संपणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराची सर्वच माध्यमे गतीमान होतील आणि प्रत्येकाला पैशाची गरज भासणार आहे. त्यामुळे बँकेत अचानक लोकांची गर्दी वाढू शकते. अशा स्थितीत सर्वाची सुरक्षा अबाधित ठेऊन प्रत्येकाला बँकेच्या सुविधा कशा प्रदान करता येतील, याविषयी बँकाना मात्र चिंता लागली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT