हिंगणा - वितरण केंद्राला वीजपुरवठा करणारे वीज उपकेंद्र.
हिंगणा - वितरण केंद्राला वीजपुरवठा करणारे वीज उपकेंद्र. 
विदर्भ

वीज कर्मचारी आठ, गावे २८!

सकाळवृत्तसेवा

वीज वितरणासाठी २४०  ट्रान्सफॉर्मर; ग्राहकसंख्या आठ हजारांच्या घरात
हिंगणा - महावितरण कंपनीच्या हिंगणा वितरण विभागात २८ गावांचा समावेश आहे. आठ हजारांच्या घरात ग्राहकांची संख्या असून २४० ट्रान्सफॉर्मर वीजसेवेसाठी बसवण्यात आले आहेत. वीज वितरण व्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्यासाठी केवळ आठ कर्मचारी कार्यरत आहेत. यामुळे वीज व्यवस्था सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हिंगणा वीज वितरण केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील बहुतांश गावाचा समावेश आहे. ६ हजार घरगुती ग्राहक, १२०० कृषी पंपधारक व इतर ग्राहक मिळून ८ हजार ग्राहकांची संख्या आहे. वीज वितरणाचे जाळे पसरविण्यासाठी २४० ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहेत. यात २२० केव्ही, १०० केव्ही, ६३  केव्ही ट्रान्सफॉर्मरचा समावेश आहे. तालुक्‍यापासून लांब अंतरावर असलेल्या २८ गावांमध्ये वीज कर्मचाऱ्यांना सेवा द्यावी लागते.

हिंगणा वितरण केंद्रांतर्गत बारा कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यातील चार पदे रिक्त असून यात वरिष्ठ तंत्रज्ञ व कनिष्ठ तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. आठ वीज कर्मचाऱ्यांच्या भरोशावर या गावांचा कारभार सुरू आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत ट्रान्सफॉर्मरवर ‘लोड’ येतो. विजेचा सर्वाधिक वापर उन्हाळ्याच्या काळात होतो. यामुळे ट्रान्सफॉर्मर टिप होण्याच्या घटना वारंवार घडतात. वादळ आले की विजेच्या तारा तुटण्याचे प्रमाणही अधिक आहे. अशा परिस्थितीत आठ कर्मचारी कंत्राटी कामगारांना सोबत घेऊन वीज दुरुस्तीचे काम करतात. ४३ अंश सेल्सिअस तापमान असतानाही कर्मचाऱ्यांना विजेच्या खांबावर दुरुस्तीसाठी चढावे लागते.

वीज कर्मचाऱ्यांना थकीत वीज बिलाची वसुली करण्याचेही काम दिले जाते. वीज व्यवस्था सांभाळून सर्वच जबाबदारी कर्मचारी पार पाडत आहे.
महावितरण कंपनीने रिक्त कर्मचाऱ्यांची पदे भरणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या दिवसात वादळ व पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. अशावेळी कर्मचारी संख्या तोकडी पडत असल्याने वेळेवर दुरुस्तीचे काम होत नाही. पावसाळ्यापूर्वी वीज कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरून वीज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हातभार लावणे गरजेचे आहे.

ग्राहकांना वाढीव वीजदराचा फटका
महावितरण कंपनीला तीन टक्‍के वाढीव वीजदर आकारण्याला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. १ एप्रिलपासून वाढीव दर लागू होणार होते. मात्र महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका सुरू असल्यामुळे वाढीव वीजदराचे पत्र अद्याप महावितरणच्या कोणत्याही कार्यालयात पाठविण्यात आले नाही. निवडणुका संपताच वाढीव वीज दरवाढ लागू होण्याची शक्‍यता आहे. याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

कृषी पंपधारकांकडे कोट्यवधीची वसुली थकीत
हिंगणा वितरण विभागाअंतर्गत १२०० कृषी पंपधारकांची संख्या आहे. यांच्याकडे कोट्‌यवधी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. सवलतीच्या दरात वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना वीजबिल माफ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी कृषिपंपाची वीजबिलाची रक्कम थकीत राहत आहे. वीजबिलाची रक्कम भरण्यास शेतकरी सक्षम नाही. यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे वीजबिल शासनाने सरसकट माफ करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT