येथे लोकवर्गणीतून उभारण्यात येत असलेल्या स्मशानभूमीच्या कामाची पाहणी करताना ग्रामस्थ. 
विदर्भ

अखेर गावकऱ्यांनीच घेतला स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय,पळसोनीत लोकवर्गणीतून बांधकाम सुरू

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ)  : तालुक्‍यातील दोन हजार पाचशे लोकसंख्या असलेले पळसोनी या गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नसल्याने नदीपात्रात अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र, गेल्या 15 जूनला मृतदेह वाहून जाण्याची दुर्दैवी घटना घडल्याने प्रशासनाची वाट न बघता गावकऱ्यांनीच लोकवर्गणीतून स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेतला असून, कामालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासनाला गावकऱ्यांनी चांगलीच चपराक दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत "सकाळ'ने आतापर्यंत पाठपुरावा केला.

माणूस जन्माला आला की, मरण हे अटळ असते. मरणानंतर अंत्यसंस्कार योग्यपद्धतीने व्हावा, याकरिता प्रत्येक गावात स्मशानभूमी बांधण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. शहरी भागात प्रशस्त स्मशानभूमी उभारल्या आहेत. फुलझाडे लावून सुशोभित करण्यात आल्या आहेत. अंत्यविधीला आलेल्या नागरिकांना बसण्याकरिता सिमेंटचे बाके ठेवण्यात आलेली आहेत, तर ग्रामीण भागात चित्र उलटे आहे.

अनेक गावांत तर स्मशानभूमीच अस्तित्वात नाहीत. अंत्यसंस्कार करण्यात येत असलेल्या स्थळी कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे गावालगत असलेल्या नदी-नाल्याच्या काठांवर अंत्यसंस्कार करावा लागतो. पावसाळ्यात पाऊस सुरू असल्यास पाऊस थांबेपर्यंत अंत्यविधी करण्यासाठी वाट बघावी लागते. हे चित्र तालुक्‍यातील अनेक गावांत दिसून येते.

तालुक्‍यातील पळसोनी या गावातील सीताराम बेलेकर यांचा 15 जूनला अपघाती मृत्यू झाला होता. गावाला लागूनच असलेल्या निर्गुडा नदीच्या कोरड्या पात्रात अंत्यसंस्कार करण्यासाठी सरण रचण्यात आले होते. अग्नी देताच नदीपात्रात अचानक पाण्याचा प्रवाह सुरू झाला आणि काही क्षणातच पाण्याच्या प्रवाहाने सरणासकट मृतदेह वाहून गेल्याची अतिशय दुर्दैवी घटना गेल्या 15 जूनला घडली होती. या घटनेने तालुक्‍यात खळबळ उडाली होती. त्याचबरोबर प्रशासनाविरोधात संतापही वक्त केला जात होता. प्रशासन कागदीघोडे नाचविण्यात धन्यता मानत असल्याने झालेल्या घटनेची दखल गावकऱ्यांनीच घेतली आणि लोकसहभागातून स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेत बांधकामाला सुरुवातही केली आहे.

दहा वर्षांपासून मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
गेल्या दहा वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी होती. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष ही दुर्दैवी घटना घडण्यास कारणीभूत आहे. तालुक्‍यातील अनेक गावांत पळसोनी या गावासारखीच परिस्थिती असल्याने खुजी मानसिकता असलेल्या प्रशासनाला आता तरी जाग येईल का, हा खरा प्रश्न येथे अनुत्तरित आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माऊंट मेरी चर्चमध्ये ख्रिसमसचा जल्लोष, प्रभू येशूच्या जन्मोत्सवासाठी वांद्र्यात गर्दी

SCROLL FOR NEXT