farm ponds
farm ponds 
विदर्भ

Farmer : शेतकऱ्यांना सुवर्णसंधी! शेततळ्यासाठी आता ७५ हजार रुपये अनुदान

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी शासन शेततळे योजना अनुदानावर राबवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पनात वाढ होऊन त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंर्तगत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी ७५ हजार रुपये अनुदान देय असून, शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागेल.

अकोला जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलबूंन असलेली कोरडवाहू शेती आहे. जिल्ह्यातील विविध भागातील पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे खंड या प्रमुख नैसर्गिक आपत्ती आहेत. यामुळे सिंचना अभावी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाण्यात घट येते. जिथे पाण्याचा जास्त ताण पडतो तेथील पिके नष्ट देखील होतात. पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा ओढे, नाले, नदी इत्यादीव्दारे वाहून जाणारा अपधाव उपसून त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देणे हा यावरील एक उपाय आहे. अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्या अंतर्गत जमिनीकरिता शेततळे हे वरदान ठरू शकते. शेततळे योजनेत आता १५ बाय १५ बाय ३ मी. ते ३० बाय ३० बाय ३ मी. या आकारमानातील शेततळयाच्या समावेश करण्यात आलेला आहे. तसेच शेततळयाच्या आकारमानानुसार कमाल ७५ हजार रुपये अनुदान देय राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT