file photo 
विदर्भ

शेतकऱ्यांना तारणार यंदाचा खरीप हंगाम...करा नियोजन

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया/तिरोडा : जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रब्बी पिकांची लागवड केली जाते. खरिपाचे क्षेत्र हे अधिक आहे. कोरडवाहूसह ओलिताखालील क्षेत्रही अधिक आहे. सध्या मे महिन्याचे कडक उन्ह डोक्‍यावर घेऊन शेतकरी खरिपाच्या पूर्वतयारीला लागला आहे. कुटुंबासह शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात हंगामपूर्व तयारी करीत आहे.

शेणखत टाकणे, काट्या वेचने, जमीन भुसभुशीत करणे या कामांना गती देऊ लागला आहे. यातच कोरडवाहू शेतीचे क्षेत्र अधिक असल्याने अशा शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना दरवर्षी करावा लागतो. हे होऊ नये म्हणून कृषी विभागही सज्ज झाला आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कमी व मध्यम कालावधीचे धानपीक घेण्यासाठी कृषी विभाग प्रोत्साहित करीत आहे. तिरोडा तालुक्‍यात येत्या खरीप हंगामात 32 हजार हेक्‍टर शेती धानपिकाखाली येणार आहे. तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या धानाच्या वाणाची लागवड करावी, असे सुचविले आहे.

कमी कालावधीचे पीक घ्या

जास्त कालावधीच्या धानवाणाची लागवड केल्यास पिकाची कापणी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात होते, त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन रब्बी पिकाच्या लागवडीला उशीर होतो. तसेच लागवडीचे क्षेत्र कमी होऊन योग्य हवामान न मिळाल्यामुळे वजनात घट येते. याला पर्याय म्हणून खरीप हंगामात धानपिकाचे कमी ते मध्यम कालावधीचे जसे साकोली 6, सिंदेवाई 1, एमटीयू 1010, आयआर 64, आयआर 36, सीओ 51, सिंदेवाही 2001, एमटीयू 1001, पीकेव्ही एमएमटी, साकोली 9, पीडीकेव्ही किसान या वाणाची तसेच इतर शिफारशीत केलेल्या धान वाणाची लागवड केल्यास पिकाची कापणी 15 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत होईल. जमिनीत ओलावासुद्धा टिकून राहील.

जास्तीत जास्त गावात वनराई बंधारे बांधा

तिरोडा तालुक्‍यातील जास्तीत जास्त गावात वनराई बंधारे निर्माण करून त्यामध्ये पावसाळ्यात पडलेले पाणी साठवून ठेवावे व त्या पाण्याच्या साठ्याचा उपयोग संरक्षित ओलितासाठी रब्बी पिकांसाठी करण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. धानपीक लावताना पट्टा पद्धतीचा अवलंब करावा, त्यामुळे तुडतुड्याचे व्यवस्थापन, पिकांचे निरीक्षण व फवारणी करण्यासाठी सोईचे होते, खरीप हंगामात पेरीव पद्धतीत कमी ते मध्यम कालावधीचे धान लागवड केल्यास पावसाचा पिकाला फायदा मिळतो, खरीप हंगामात धानपिकाव्यतिरिक्त मका, खरीप तीळ, उथळ भागांमध्ये तूर तसेच बांधावर तूर पीक घेणे शक्‍य असल्यास घ्यावे, पाणी न साचणाऱ्या भागात भाजीपाला पिके जसे मिरची, टमाटर, वांगी, भेंडी, कारले आदी पिके घ्यावीत.

कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचना

  • रब्बी पिके निघालेल्या शेतीची त्वरित नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडीचा कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल.
  •  जमीन सुधारणेची कामे प्राधान्याने हाती घ्यावी.
  •  शेताबाहेर पाणीमिश्रित माती वाहून जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
  •  पीक नियोजनाप्रमाणे मातीचे नमुने घेऊन तपासणीकरिता विद्यापीठाच्या किंवा शासनाच्या माती परीक्षण शाळेत पाठवावे.
  •  स्वच्छता मोहीम हाती घेऊन जास्तीत जास्त कंपोस्ट खड्डे भरावेत, शेतातील काडीकचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करावेत.
  •  शेतातील खोल मुळ्याची तणे व पालव्या खोदून काढाव्यात.
  • कडुनिंबाच्या निंबोळ्या जास्तीत जास्त गोळा कराव्यात.


कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार करा लागवड
शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धानपिकाची लागवड करताना कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या दिशा निर्देशानुसार, लागवड केल्यास धानपीक उत्पादनात भरघोस वाढ होईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आत्माअंतर्गत बियाणे, खते व किटकनाशके खरेदी केल्यास त्याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.
- मंगेश वावधने, तालुका कृषी अधिकारी, तिरोडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT