farmers facing problems due to wainganga river in sihora of bhandara 
विदर्भ

वैनगंगेने गिळली शेती, भूमिहीन शेतकऱ्यांचे पुनर्वसन कधी?

दीपक फुलबांधे

सिहोरा (भंडारा ) :  तुमसर तालुक्‍यातील बपेरा गावापासून वैनगंगेचे पात्र विस्तारत आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून शेकडो शेतकरी भूमिहीन झाले आहेत. प्रशासनाकडून रेंगेपार (पांजरा) येथील काही घरांचे पुनर्वसन केले. मात्र, भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या वैनगंगेला बपेरा येथे बावनथडी नदी मिळते. यानंतर जिल्ह्यात वाहणाऱ्या वैनगंगेचे पात्र गेल्या 20 वर्षांपासून विस्तारत आहे. यामुळे नदीकाठावरील बपेरा, सुकळी (नकुल),  देवरीदेव, गोंडीटोला, पिपरीचुन्नी, वांगी, मांडवी, परसवाडा, रेंगेपार, पांजरा, तामसवाडी, उमरवाडा, बोरी, कोष्टी व बाम्हणी आदी गावे धोक्‍याच्या पातळीत आली आहेत. नदीकाठावरील शेकडो शेतकऱ्यांची बागायती शेतजमीन दरवर्षी कमीकमी होत जात आहे. नदीला येणाऱ्या पुरामुळे काठावरील गावात पावसाळ्यात पाणी शिरते. कमी उंचीच्या पुलावर पुराचे पाणी आल्यास ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प होते. यामुळे गावकऱ्यांचा संपर्क दरवर्षीच तुटतो.

वैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी विस्तारत असल्याने काठावरील शेतकऱ्यांना मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची बागायती शेती कमी झाली आहे. दोन्ही काठावरील काही अल्प भूधारक शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे बेपत्ता झाली आहे. ज्यांनी सिंचन विहिरी बांधल्या किंवा शेतीवर कर्ज घेतले. मात्र, प्रत्यक्षात शेती वाहून गेली आहे. परंतु, 7/12 वर घेतलेल्या कर्जाचा बोजा कायम आहे. त्यांच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात बाबत समस्या निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडे कोणतीही योजना नाही. पुराच्या आपत्तीमुळे हे शेतकरी संकटात आल्याने त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

रेंगेपारचे अंशतः पुनर्वसन -
नदीचे पात्र दरवर्षी पुढे सरकत असल्याने रेंगेपार या गावातील नदीकाठावरील काही घरे वाहून जाण्याचे संकट आले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी सतत दोन ते तीन वर्ष आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयानंतर हे प्रकरण मंत्रालयात गेले. परंतु, श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात रेंगेपार या गावाचे पुनर्वसन रखडले. शेवटी धोक्‍याच्या पातळीत असलेल्या काही कुटुंबांना शासकीय योजनेतून घरकुल देण्यात आले. आता ही कुटुंबे नवीन वसाहतीत राहत आहेत.

कुटुंबाची दोन एकर शेती नदीच्या पात्रात वाहून गेली आहे. आणखी माझ्यासारख्या बऱ्याच शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे. त्याबाबत शासनाच्या विभागाला सांगितले. परंतु, आजपर्यंत कोणतीही उपाययोजना झाली नाही.
- रूपाबाई छगनलाल खंगार, भूमिहीन शेतकरी, बपेरा

बावनथडी व वैनगंगा नदी काठावरील गावात पुराचे पाणी शिरल्यानंतर शेतकरी व नागरिकांचे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना शासनाने तातडीने मदत दिली पाहिजे. बपेऱ्यातील 85 हेक्‍टर शेती नुकसानग्रस्तांना मोबदला देण्याची गरज आहे.
- किशोर रहांगडाले, सामाजिक कार्यकर्ता बिनाखी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT