kazakistan 
विदर्भ

कझाकिस्तानात अडकलेल्या अमरावती जिल्ह्यातील मुलींचे अखेर मायभुमीत पाऊल

सकाळ वृत्तसेवा

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे सारे जग जिथे होते तिथेच थांबले. यामध्ये सर्वात अधिक अडचण झाली ती विदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींची. कॉलेज बंद पडले, मात्र घरी परतण्याचे मार्ग बंद झाले होते. खाण्यापिण्याचे हाल होत होते. मात्र भारतात पालक आणि परदेशात विद्यार्थी हतबल होते.
वैद्यकीय शिक्षणासाठी कझाकिस्तानात गेलेल्या विदर्भातील पाच विद्यार्थिनी अचानक झालेल्या लॉकडाउनमुळे तेथेच अडकल्या होत्या. सकाळने सर्वांत आधी हा विषय प्रकाशझोतात आणल्याने अखेर त्या मुली मायदेशी परतल्या असून सध्या त्यांना जयपूर येथे विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
कझाकीस्तानात धामणगाव, मंगरुळ दस्तगीर, वर्धा व बुलडाणा येथील विद्यार्थिनी शिक्षणासाठी गेल्या होत्या. मात्र, त्या परतू शकल्या नाहीत. त्यांना जेवणासह इतर गैरसोयींचा सामना करावा लागत होता. केंद्रीयमंत्री विदेश मंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी दूतावासाकडे प्रयत्न करून मायदेशी आणावे, अशी मागणी या विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांनी केली होती.
दरम्यान, या पाचही मुली बुधवारी (ता.17) जयपूर विमानतळावर पोहोचल्या. त्यांना जयपूर येथे 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. यासंदर्भात "सकाळ'ने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी "सकाळ'चे आभार मानले.
कझाकिस्तानच्या कारागंदा मेडिकल युनिव्हार्सिटीमध्ये एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनी लॉकडाउनमुळे कारागंदा शहरात अडकून पडल्या होत्या. त्यात धामणगाव येथील आदिती काळे, मंगरुळ दस्तगीर येथील किरण टेंपे, बुलडाणा येथील मंजिरी महंत व वर्धा येथील रिया कांबळे, गुंजन बोकडे या विद्यार्थिनींचा समावेश होता. या विद्यार्थिनींना सुरुवातीला त्याच ठिकाणी थांबण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. त्यांचा पालकांशीही संपर्क होत नसल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली होती.

या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी लोकप्रतिनिधींसह शासनाने प्रयत्न करावेत, त्यांना एअरलिफ्ट करून परत आणावे, अशी मागणी धामणगाव येथील आदिती काळेचे वडील डॉ. राजेश काळे व पालकांनी प्रशासनाकडे केली. अखेर त्या मायदेशी परतल्या असून 14 दिवसानंतर या विद्यार्थिनी त्यांच्या घरी जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT