If the payment is not made within fortnight the crop insurance company will be besieged 
विदर्भ

शेतकऱ्यांसाठी भावना गवळी यांनी दिला इशारा; काय म्हणल्या खासदार?

सूरज पाटील

यवतमाळ : अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापूस, सोयाबीनचा तर लागवड खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत पीकविमा कंपन्यांनी बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना पीकविमा दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असल्यामुळे विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई देण्यात यावी अन्यथा पीकविमा कंपनीला घेराव घालू, असा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिला आहे. त्या पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या.

कोरोनामुळे राज्याचीच नव्हे तर जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कोरोना पाठोपाठ अतिवृष्टीचे संकट आले. शेतकऱ्यांच्या शेतातील फळे, भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

त्यानंतर संततधार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमिनीवरील सोयाबीन, धान, मका, कापूस, ज्वारी, तूर, या पिकांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने तर कहरच केला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकही परतीच्या व ढगफुटीच्या पावसाने नष्ट झाले.

शेतकरी हा नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास आर्थिक मदत मिळावी व झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी पीकविमा काढत असतो. यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख ६७ हजार २११ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा काढला आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन तसेच शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ३५ कोटी ७५ लाख १ हजार २५१ रुपयांचा विमा हप्ता भरला.

यवतमाळच्या कृषी विभागाने सुद्धा जिल्ह्यातील साडे चार लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधीत झाल्याचा अंदाज प्राथमिक सर्वेक्षणात नोंदविला आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT