जलालखेडा ः जाने कुटुंबीयांचे सांत्वन करताना सलील देशमुख.  
विदर्भ

जाने कुटुंबीयांवर प्रशासनाकडून अन्याय

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा(जि. नागपूर) : आठ महिन्यांपूर्वी वडिलांनी स्वत:चे सरण रचून कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. कुटुंबाचा गाडा हाकताना कर्जाचा डोंगर वाढत असल्याने आता मुलाने आत्महत्या केली. परंतु प्रशासन मात्र वेगळेच कारण सांगून जाने कुटुंबीयांवर अन्याय करीत असल्याचा आरोप युवानेता सलील देशमुख यांनी केला. ते मदना येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी जाने यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आले असता बोलत होते. प्रमोद यांनी मृत्यूपूर्वी कर्जबाजारीपणामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे पत्रात लिहिले आहे. तरीसुद्धा प्रशासन वेगळे कारण कसे काय देऊ शकते, असा प्रश्न आता समोर आला आहे. नरखेड तालुक्‍यातील मदना येथील प्रमोद गोपाळराव जाने यांनी गळफास लावून आत्महत्या केली. आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली होती. कर्जबाजारीपणामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याचे मृत प्रमोद प्रशासनाला सांगत होता. परंतु त्याचे त्यावेळी कोणीच ऐकले नाही. कर्जाचा डोंगर वाढच असल्याने प्रमोद यांनीसुद्धा आत्महत्या केली. घटनेची माहीती मिळताच सलील देशमुख यांनी जाने कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी कुटुंबीयांनी प्रमोद यांनी आजारामुळे आत्महत्या केली, असे कारण प्रशासन समोर करीत असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. एकीकडे शेतकरी मदत मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि दुसरीकडे प्रशासन मात्र अशा गंभीर प्रकरणात दुःखात असलेल्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. हा प्रकार गंभीर असल्याचे सांगून सलील देशमुख यांनी अधिकाऱ्यांना फोन करून चांगलेच धारेवर धरले. स्वत: मृत चिठी लिहून ठेवत आहे आणि पोलिस मात्र ती चिठ्ठी जप्त न करता वेगळेच कारण देत असल्याने सलील देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Extortion Case : पोलीसच खंडणी वसूल करु लागले तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जायचे? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिपण्णी

Nirmala Sitharaman Photo Fraud : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोटो पाहून तब्बल 43 लाख गमावले! महिलेच्या 'या' चुकीमुळे बँक खाते रिकामे, अशी झाली फसवणूक

Maharashtra Shetkari Karjmukti Yojana 2026: शेतकरी कर्जमाफीच्या GR मध्ये काय? फायदा-तोटा कुणाचा? सोप्या शब्दात गणित समजून घ्या...

'खलनायक'चा सिक्वेल येणार? ३३ वर्षांनंतर संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ पुन्हा एकत्र

"म्हणून नव्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडतं"- सई ताम्हणकर

SCROLL FOR NEXT