farmer 2.jpg
farmer 2.jpg 
विदर्भ

शेतकरी राजा... घे स्वतःची काळजी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : देशातील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी आरोग्य यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत असतानाचा, संपूर्ण देशाच्या पोषणाची जबाबदारी शेतकरी बांधव समर्थपणे पार पाडत आहेत. परंतु, ही जबाबदारी पार पाडत असताना, शेतकऱ्यांनी स्वतःच्या आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कोरोनाचे संकट निवारण्यासाठी देशातील आरोग्य यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत आहे. मात्र सर्वात महत्त्वाचे अन्न निर्मितीचे कार्य देशाचा पोषिंदा शेतकरी अखंडपणे करीत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणे एवढीच कदाचित त्याहूनही अधिक महत्त्वाची, अशी देशाच्या पोषणाची जबाबदारी शेतकऱ्यांवर येऊन पडली आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना, शेतकऱ्यांनी स्वतःच्या आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे उत्पादनापासून ते बियाणे खरेदी-विक्री, शेतमाल खरेदी-विक्री, हाताळणी, वाहतूक, पैशाची देवान-घेवान, पॅकेजींग करताना, योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बियाणे संशोधन अधिकारी डॉ. आम्रपाली आखरे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

  • बियाणे उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बियाणे गाडीमध्ये भरताना, उतरविताना, बाजारपेठेमध्ये नेताना व विक्री करताना, वैयक्तिक सुरक्षिततेचे योग्य उपाय करावे.
  • बियाणे वाहतूक करताना आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत.
  • विकलेल्या बियाण्याचे पैसे घेते वेळी आवश्यक ती काळजी घ्यावी.
  • काढणी पश्चात बियाण्यांची वाळवणी, मळणी, स्वच्छ करणे व प्रतवारी करताना तोंडावर मास्क बांधून प्रभावीपणे सामाजिक अंतर ठेवावे.
  • पाणी अथवा न्याहारी करीता उठल्यावर प्रथम साबणाने हात स्वच्छ धुवावे.
  • काढणी पश्चात बीजोत्पादन वाणांची इतर वाणांबरोबर भेसळ होऊ देऊ नये.
  • मळणीपूर्वी खळे आणि मळणीयंत्र साफ करावे.
  • साठवणुकीकरिता बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण साधारण 10 ते 12 टक्के असावे.
  • त्याकरिता बियाणे वाळवून नवीन पोत्यात भरावे.
  • कीडींचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी अगोदर वापरलेल्या गोण्या साठवणूकीसाठी वापरू नये.
  • साठवणूकीच्या गोण्यां पाच टक्के निंबोळी आर्कात भिजवून वापराव्यात.
  • बीज साठवणुकी पूर्वी उंदीर, पक्षी, घूस यांचा प्रादूर्भाव टाळण्याकरिता उपाययोजना करावी.
  • पायाभूत व प्रमाणित बियाणे, बीजप्रमाणीकरण अधिकाऱ्यांमार्फत मोहरबंद करुन प्रक्रिया केंद्रावर पाठवावे.


खरीप पेरणीकरिता बियाणे वापरताना घ्या काळजी

  •  बियाणे शुद्ध असल्यास उत्पन्नात 20 टक्क्यांपर्यंत वाढ होते.
  •  बियाण्यांची शुद्धता टिकवण्याकरिता सुधारित बियाणे प्रत्येकी तीन वर्षांनी बदलावे.
  •  बियाणे शासकीय यंत्रणा, मान्यताप्राप्त संस्था किंवा परवानाधारक विक्रेत्यांकडून घ्यावीत.
  •  बियाणे विकत घेतांना बिल घ्यावे व पेरल्यानंतर रिकामी पिशवी, लेबल जपून ठेवावे.
  •  बियाण्याच्या पिशवीवरील टॅगवरील तपशीलवार माहिती तपासून घ्यावी.
  •  बियाण्याची पिशवी फोडताना टॅग त्यावरच राहील याची काळजी घ्यावी.
  •  बियाण्याचा थोडा नमुना पिशवीत शिल्लक ठेवावा.
  •  कडधान्ये व अन्नधान्य उत्पादनासाठी प्रमाणित बियाणे वापरावीत.
  •  बियाणे खरेदीकरिता अडचणी येत असल्यास घरी उपलब्ध मागील हंगामातील बियाणे वापरावे.
  •  अशा बियाणांची पेरणीपूर्वी घरच्या घरी तपासणी करावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT