अमरावती : पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ होत असल्याने व जलसंचय क्षमता संपल्याने विसर्ग करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत अप्पर वर्धा व निम्न वर्धा प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग सुरू असून जलसंपदासह इतर सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय नसल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना पत्र पाठवून त्यांचे कान टोचले आहेत.
जिल्ह्यात सद्यःस्थितीत सर्वत्र पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्जन्यमान वाढून धरणांतील जलपातळीत वाढ होत आहे. धरणांची जलसंचय क्षमता संपल्याने व सतत येवा सुरू असल्याने जिल्ह्यातील अप्पर वर्धा व निम्न वर्धा या दोन्ही मोठ्या धरणांसह मध्यम धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. विसर्ग करण्यापूर्वी त्याची सूचना नदीकाठच्या गावांना द्यावी लागते व ती जबाबदारी जलसंपदा विभागासह महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यावर आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने या संबंधित सर्व विभागांना आपत्ती नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून त्यांच्यात समन्वय नसल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. नदीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊन नागरिकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अनुचित घटनाही घडण्याची शक्यता असल्याने दक्षता घेणे गरजेचे आहे. गेल्या तीन दिवसांपासून अप्पर वर्धाची, तर त्यापूर्वी निम्न वर्धा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यावेळी दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे आढळले आहे. दोन्ही धरणांतील पाण्याचा विसर्ग एकाच नदीत होत असल्याने धोका वाढला आहे. अप्पर वर्धा व निम्न वर्धा प्रकल्पांच्या अधीक्षक व कार्यकारी अभियंता यांना समन्वय ठेवून विसर्ग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षेचाही प्रश्न
अप्पर वर्धा व निम्न वर्धा या दोन्ही धरणांचे दरवाजे उघडल्याने ते विहंगम दृश्य बघण्याकरिता पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असून पर्याप्त संख्येत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले नसल्याचेही समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.