file photo
file photo 
विदर्भ

दीक्षाभूमी आमची क्रांतिमाय

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 साली नागवंशीयांच्या भूमीत पाच कोटी अस्पृश्‍यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. धम्माच्या प्रकाशमार्गातून बौद्ध बांधवांसाठी दीक्षाभूमी वैचारिक सागराचे ठिकाण बनली. दीक्षा सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी "तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी' असा धम्मघोष विविध गीतांच्या सूरांतून पुढे आला. तर लाखो उपासकांनी दीक्षाभूमीवर बुद्धवंदना ग्रहण केली. हक्काची लढा सांगणारी क्रांतिभूमी असलेली दीक्षाभूमी ही आमची क्रांतिमाय आहे, अशा शब्दांत दीक्षासोहळ्याच्या आठवणींना आज येथे उजाळा देण्यात आला. 
सोमवारी सकाळीपासूनच शुभ्र वस्त्रे परिधान करून हातात पंचशील ध्वज घेतलेल्या बौद्ध बांधवांच्या गर्दीने दीक्षाभूमी परिसर बौद्ध उपासकांच्या गर्दीने फुलून गेला होता. अनेकांनी आपल्या कुटुंबीयांसह दीक्षाभूमीवर हजेरी लावून अख्खा दिवस दीक्षाभूमीवर घालविला. 
छप्पन्नच्या धम्मक्रांतीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गीतांनी धम्मदीक्षा सोहळ्याच्या स्मृती जागवल्या. नुकतेच आठवडाभरापूर्वी अशोक विजयादशमीच्या पर्वावर लाखो उपासकांनी दीक्षाभूमीवर आपली उपस्थिती दर्शविली होती. एक लाखावर उपासकांनी 14 ऑक्‍टोबरला बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. रमाईची यशोगाथा गावखेड्यात पोहोचवणारे राजकुमार वंजारी यांनी दीक्षाभूमी ही आमची क्रांतिमाय असून येथून मिळालेली ऊर्जा नव्या पिढीला प्रेरणा देत असल्याची भावना व्यक्त केली. 
"बुद्ध आणि त्यांचा धम्म'ची विक्री सर्वाधिक 
धम्मदीक्षेचे महत्त्व लक्षात घेत दीक्षाभूमीवर बुद्ध आणि बाबासाहेबांच्या मूर्ती, फोटो, सीडींसह पुस्तकांचे स्टॉल मागील आठ दिवसांपासून या परिसरात लावण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात पुस्तकांची विक्री येथे होत असल्याने राज्यभरातून सुमारे साडेतीनशेंपक्षा अधिक पुस्तक विक्रीचे स्टॉल लावले जातात. तर चळवळीतील कार्यकर्तेदेखील पुस्तकांचे स्टॉल लावतात, ही दीक्षाभूमीची विशेषतः आहे. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती पुस्तक खरेदी करून घेऊन जात असल्याचे सत्यांश लोखंडे या स्टॉलधारकाने सांगितले. औरंगाबाद येथून आलेले लोखंडे यांनी "बुद्ध आणि त्यांचा धम्म' सुमारे दीडशे ग्रंथ विकल्याचे सांगितले. 
दीक्षाभूमीत जाणवली राजा ढालेंची अनुपस्थिती 
आंबेडकरी चळवळीतील कवी, विचारवंत, दलित पॅंथर ते मासमूव्हमेंटचे सूत्रधार राजा ढाले यांचे निधन झाले. यामुळे त्यांची यावर्षी दीक्षाभूमीवर अनुपस्थिती चळवळीतील कार्यकर्त्याना जाणवली. ढाले म्हणत होते, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला "दलित'पणाच्या दलदलीतून मुक्त केले. बौद्ध ही नवी ओळख दिली. 22 प्रतिज्ञांचे कसोशीने पालन करत दसरा नव्हे तर 14 ऑक्‍टोबर हाच धम्मदीक्षा दिन पाळा, असा संदेश देण्यासाठी दरवर्षी ढाले दीक्षाभूमीवर येत होते. "दीक्षाभूमी'वर 14 ऑक्‍टोबरला दिसलेल्या प्रचंड गर्दीमुळे ढाले यांची आठवण आपोआपच नजरेसमोर आली, असे रिपब्लिकन मूव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वहाणे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT