Gadchiroli-Chimur
Gadchiroli-Chimur 
विदर्भ

Loksabha 2019 : नेते-उसेंडी यांच्यातच लढत

सुरेश नगराळे

खासदारपदाच्या काळात अशोक नेते यांनी मतदारसंघात सर्वव्यापी न केलेले काम आणि मतदारांशी संपर्कात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांची पिछाडी, उमेदवारांची भाऊगर्दी असे मतदारसंघाचे चित्र असले तरी लढत सरळ अशी आजची स्थिती आहे. मतविभाजन कसे होणार, यावर विजयाचे गणित जुळणार आहे.

राज्यात विस्ताराने मोठ्या चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजप आणि काँग्रेस दोघांसाठी फारशी सोपी नाही. एकीकडे भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्याबद्दल नाराजी, दुसरीकडे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी डॉ. नामदेव उसेंडी यांना अडचणीची ठरणार आहे. तरीही दोघांतच थेट लढत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार किती मते घेतात, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

मतदारसंघातून अशोक नेते, डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. रमेशकुमार गजबे यांच्यासोबत ‘बसप’चे हरिश्‍चंद्र मंगाम व आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव नन्नावरे, असे पाच उमेदवार रिंगणात आहेत. 

यंदाची निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर गाजण्याची चिन्हे आहेत. प्रचाराला रंगत चढत आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच नेते यांनी मतदारसंघात मतदारांशी संपर्क साधला होता. त्यांनी आघाडी घेतली. परंतु, डॉ. उसेंडी त्यात प्रारंभीच मागे राहिल्याने त्यांची प्रचारात दमछाक होतेय. आरमोरी विधानसभा क्षेत्रात माना समाज मोठ्या संख्येने आहे, त्याचा फायदा बहुजन वंचित आघाडीचे गजबे यांना होणार आहे. त्याचा भाजपच्या मताधिक्‍यावर परिणाम शक्‍य आहे.

जनतेत नेते यांच्याबद्दल नाराजी असल्याने त्यांना उमेदवारी देऊ नये, असे लेखी पत्र भाजपच्या पाच आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे दिले होते. त्यामुळे नाराज आमदार पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून कितपत मनाने प्रचारात सहभागी होतील, याबाबत शंकाच आहे. ही पक्षांतर्गत गटबाजी नेतेंसाठी अडचणीची ठरू शकते. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधानंतरही पक्षक्षेष्ठींनी डॉ. उसेंडींनाच मैदानात उतरवले. त्यामुळे वडेट्टीवारांचा गट नाराज आहेच. 

नेतेंमागे कार्यकर्त्यांची फळी
भाजपची बूथ रचना, तसेच गावागावांत कार्यकर्त्यांची फळी आहे. यासोबतच संघाचे कार्यकर्ते निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरल्याने नेते यांना प्रचारासाठी मोठी मदत होत आहे. साम, दाम, दंड हेही पाठीशी आहे, ही भाजपची जमेची बाजू आहे. मात्र, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांशी गेल्या पाच वर्षांत त्यांनी संवाद साधला नाही. यामुळे त्यांची नाराजी अडचणीची ठरू शकते.

नेतेंवर नाराजांवर उसेंडींची भिस्त
मतदारसंघात मागील पाच वर्षांत एकही मोठे काम झाले नाही. त्यामुळे खासदार नेतेंबाबत नाराजी असणाऱ्यांची डॉ. उसेंडी यांच्याबद्दल सहानुभूती दिसून येते. प्रचारातील स्थानिक मुद्दे, धनगर आरक्षण, वन कायद्याबद्दल आदिवासींमधील नाराजी या उसेंडींच्या जमेची बाजू आहेत. त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT