File photo
File photo 
विदर्भ

महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षाची गरज : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : विरोधी पक्ष नेताच भाजपच्या दावणीला बांधला जात असेल तर सरकारला जाब कोण विचारणार? सत्ताधाऱ्यांवर अंकुश कोण ठेवणार? यासाठी महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. त्यासाठीच मनसेच्या उमेदवारांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. ते येथे सोमवारी (ता. 14) मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
येथील शासकीय मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्ला चढविला. नोटाबंदीमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. "पारले जी'सारख्या नामांकित कंपनीतील दहा हजार कामगारांना नोकरीतून काढण्यात आले; तर कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. यापुढे हे सरकार शासकीय नोकरीतील 30 टक्‍के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. मागील निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या ढिसाळ धोरणाचा लाभ भाजप-शिवसेनेला झाल्याचे स्पष्ट करीत ठाकरे पुढे म्हणाले की, शेतकरी हिताच्या अनेक योजना भाजपने जाहीरनाम्यात मांडल्या होत्या; त्या मागील पाच वर्षांत पूर्णत्वास गेल्याच नाहीत. थापा मारणारे हे सरकार असून भाजपच्या जाहीरनाम्याची यावेळी ठाकरे यांनी पोलखोल केली. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्येकरिता अग्रेसर असलेला जिल्हा म्हणून देशात कुप्रसिद्ध आहे, ही बाब लाजिरवाणी आहे. परंतु, त्यांच्या कार्यकाळात तर 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सभेला मनसेचे राज्य उपाध्यक्ष आनंद एबंडवार, मनसेचे विठ्ठल लोखंडकार या नेत्यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : मताधिक्य राखण्याचे दिग्गजांपुढे आव्हान ; दहापैकी सात जागांवर मिळाला होता लाखो मतांनी विजय

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Latest Marathi News Live Update : दिल्ली अग्निशमन विभागाला 60 हून अधिक फोन; शाळांमध्ये बॉम्ब तपासणी सुरू

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Gold ETF: ‘ईटीएफ’ देतेय ‘सोन्या’सारखी संधी; गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामुळे चलती

SCROLL FOR NEXT