Samruddhi Express Way  esakal
विदर्भ

Samruddhi Express Way : समृद्धी महामार्गावर का होत आहेत अपघात?

११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वायफळ टोलनाक्यावर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले.

सकाळ डिजिटल टीम

करिश्मा निकम

Samruddhi Express Way : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मार्ग मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग म्हणूनही ओळखला जातो. १० जिल्ह्यांतील ३९२ गावांमधून जाणारा महामार्ग दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करतो. पण मागच्या सहा-सात महिन्यामध्ये समृद्धी महामार्ग अपघातांचा मार्ग म्हणून आपल्यासमोर आला असेल. अनेक छोटेमोठे अपघात या महामार्गावर झाले, अनेक तज्ज्ञांनी चर्चा केल्या पण नेमकं समृद्धीवर होणाऱ्या अपघातांची कारणे काय आहेत ते आपल्याला माहितीये? जाणून घेऊया.

११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वायफळ टोलनाक्यावर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची चाचणी मोहीम घेतली. शिर्डी ते नागपूर दरम्यान असलेला ५२० किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यावर उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः कार चालवली पण त्यानंतर हा महामार्गावरील अपघात बघता हा समृद्धी नाही तर "स्वर्गात घेऊन जाणारा महामार्ग" असल्याची टीका सरकरावर झाली. मागच्या सहा ते सात महिन्यापासून समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे.

डिसेंबर २०२२ ते जून २०२३ दरम्यान किती झाले अपघात?

एकूण अपघात - ३१५

एकूण किरकोळ जखमी - ४२८

एकूण गंभीर जखमी - २२२

एकूण मृत्यू - ८८

जाणून घेऊया अपघात होण्यामागची कारणे

६०० किलोमीटर असलेल्या या समृद्धी महामार्गावर १२० च्या वेगाने वाहने चालतात. या मार्गामध्ये कोठेही अडथळे किंवा स्पीड ब्रेकर नसल्यामुळे शंभर चा स्पीड कधी १२० होतो हे चालकाला कळत नाही. स्पीड वाढल्यामुळे टायर गरम होतात व ते फुटतात. छोटी गाडी असेल तर स्पीड कंट्रोल होत नाही. महामार्गावर कुठेच थांबा नसल्यामुळे वाहन स्पीड मध्ये असते त्यामुळे रोड हिप्लोटाइज हा प्रकार चालकासोबत होतो. या सर्व कारणांमुळे तेथे अपघात होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

उपाय

  • या महामार्गावर प्रत्येकी शंभर किलोमीटरवरती थांबण्यासाठी स्पॉट पाहिजे.

  • दोन-तीन तास चालल्यानंतर चालकाचे लक्ष विचलित करण्यासाठी छोटे स्पीड ब्रेकर पाहिजेत.

  • महामार्ग सुरू होताना नायट्रोजन हवा चेक करण्यासाठी स्पोर्ट पाहिजे.

  • ड्रिंक आणि ड्राइव्ह टेस्ट करण्यासाठी चेक पोस्ट पाहिजे.

  • ठिकठिकाणी ब्लॅक स्पॉट्स आणि धोकादायक वळणे चिन्हांकित केलेले पाहिजेत.

  • ज्या वाहनांचे टायर्स सुसंगत नाहीत, खराब स्थिती किंवा जीर्ण आहेत त्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी सक्त बंद केली पाहिजे. त्यांना एक्सप्रेस वेमध्ये प्रवेश नाकारला जावा.

  • ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंगमध्ये गुंतलेल्या वाहनांवर लक्ष ठेवावे.

  • या उपाय योजना केल्या तर समृद्धी महामार्गावरील अपघाताची संख्या कमी होईल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत विविध विषयावरील देखावे

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

SCROLL FOR NEXT