विदर्भ

आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

नागपूर - वारंवार फोनवर कोणाशी बोलते, शॉर्ट कपडे का घालते, गॅलरीत का उभी राहते? या आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. 

कोमल संजय सराटे (वय १७, रा. अभ्यंकरनगर) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. माहितीनुसार, संजय सराटे हे प्रॉपर्टी डीलर असून त्यांना कोमल आणि चैताली दोन मुली आहेत. कोमल ही बारावीत, तर चैताली दहावीत आहे. कोमल घरात मोठी असल्याने तिच्यावर योग्य संस्कार व्हावेत, यासाठी पालकांची धडपड सुरू होती. तिचे वाकडे पाऊल पडू नये म्हणून तिच्या वागण्यावर पालकांचा वॉच होता. मात्र, तिला पालकांची बंधने झुगारून जगायला आवडत होते. सांगितलेले ऐकत नसल्यामुळे किंवा योग्य वागत नसल्यामुळे पालक तिच्यावर ओरडत होते. कोमलने या सर्व त्रासाला कंटाळून रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची मृत्यूची नोंद केली.

सध्याच्या युगात पालक आणि पाल्यांमधील संवाद लोप पावत आहे. पैसे कमविण्याच्या नादात पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होते. केवळ जाब विचारण्यापुरताच संवाद त्यांच्यात होत आहे. जुनी पिढी आणि नवीन पिढीतील अंतर अशा घटनांना कारणीभूत आहे. पालकांचा निगेटिव्ह संवाद हा मुलांमध्ये दुरावा निर्माण करतो. पाल्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आणि मनमोकळा होण्यास वाव दिल्यास घरातील वातावरणात आणि विचारांमध्ये फरक पडू शकतो. पालकांच्या रागापोटी मुलांच्या आत्महत्यासारख्या घटना म्हणजे ऑनर किलिंगची रिॲक्‍शन देणाऱ्या असतात. 
- डॉ. राजा आकाश (मानसोपचारतज्ज्ञ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT