After taking the exam, take out an insurance  
नागपूर

परीक्षा घेताय मग, एक कोटीचा विमा काढा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या निर्णयाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने भूमिका घेत, परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली असून जर परीक्षा घ्यायचीच असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला एक कोटीचा विमा कवच देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.


राज्यातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास काही संघटना करीत आहेत. मात्र, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जवळपास एकाही महाविद्यालयात परीक्षा घेणे शक्‍य नाही. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अंतिम वर्ष महत्वाचे आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे आरोग्यही तेवढेच महत्वाचे असल्याचा दाखला देत, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षातील मिळालेले पूर्ण गुण व या वर्षातील 50टक्के गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. याशिवाय बॅकलॉग विषयात विद्यार्थ्यांना मागील सेमिस्टरमधील प्राप्त झालेले पूर्ण गुण आणि या वर्षात 50 टक्के गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करावे. असा निर्णय न झाल्यास विद्यार्थ्यांचे पुढील एक वर्ष वाया जाईल व त्यांना पुढील नोकरी व शिक्षणासाठी अर्ज करता येणार नसल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे. 

याउपरही सरकारने निर्णय फिरवून परीक्षा घेण्याचा विचार केल्यास विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता, त्यांना एक कोटीचे विमा कवच देण्याची मागणी महासंघाने केली आहे.
यासंदर्भात उपजिल्हाधिकारी खजांची यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे नागपूर जिल्हा अध्यक्ष निलेश कोढे, शहराध्यक्ष विनोद हजारे, नागपूर जिल्हा महासचिव रोशन कुंभलकर, सचिव शुभम वाघमारे, प्रणय पांढरे, चेतन काळे यांनी निवेदन सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा गोंधळ

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT