Anil Deshmukh sakal
नागपूर

Anil Deshmukh: तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या ;अनिल देशमुख, पावसाळी अधिवेशनात घोषणा करावी

तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कर्जमाफी केली पाहिजे. पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केली. महायुती सरकारचे तीन महिने आता शिल्लक राहिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कर्जमाफी केली पाहिजे. पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केली. महायुती सरकारचे तीन महिने आता शिल्लक राहिले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमचे सरकार येणार असल्याचे भाकितही त्यांनी केले.

राज्यात अनेक अधिकारी सरकारच्या दबावात नियमबाह्य काम करीत आहेत. सध्याच्या सरकार तीन महिन्याचे आहे. त्यानंतर आमचे सरकार येणार आहे. त्यामुळे दबावात नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या याद्या आम्ही तयार करीत आहोत. सर्वच जिल्ह्यांत अशा याद्या तयार केल्या जात आहेत. विधानसभेनंतर आमचे सरकार आल्यावर आम्ही त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करू असा इशाराही अनिल देशमुख यांनी दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचे आंदोलन सुरू असताना आरक्षणाचे आश्वासन दिले होते. २०१४ नंतर मुख्यमंत्री होते मात्र आजवर ते आश्वासन पूर्ण झालेले नाही आणि याची जाणीव धनगर समाजाला असल्याचे देशमुख म्हणाले. पुण्यात वारंवार ड्रग्स प्रकरणे घडत आहेत. ललित पाटील प्रकरण ताजे असताना हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ड्रग विकले जात असल्याचे व्हिडीओ समोर आले आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे.

एक-दोन अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही. जे अधिकारी यात दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. पुणे सांस्कृतिक नगरी पुण्यात अशा घटना वारंवार होणे योग्य नाही. शासनाने याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हिट अँड रनच्या घटना सतत घडत आहेत. नागपूरच्या राम झुलावरील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितिका मालू १३० दिवसांपासून फरार आहे. तिला राजकीय संरक्षण असल्याची चर्चा आहे. वाहतूक पोलिस संख्या वाढवली पाहिजे. पोलिस निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया गतिमान केली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार दिल्ली दरबारी जाऊन हजेरी लावावी लागते. वारंवार परवानगी घ्यावी लागत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT