balasaheb thackeray esakal
नागपूर

बाबरी प्रकरण : "बाळासाहेब ठाकरेंसह तिघांचा भारतरत्न देऊन सन्मान करावा"

"रामाच्या नावावर सत्तेत आलेले रामराज्य विसरले"

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज २९ वर्षे पूर्ण झाली. यासाठी उभारलेल्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या आणि जबाबदारी घेणाऱ्या चार प्रमुख नेत्यांचा मोदी सरकारनं भारतरत्न देऊन गौरव करावा अशी मागणी, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. या चार नेत्यांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैद्यनाथ यांचा समावेश असल्याचंही तोगडिया यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

अगदी सुरूवातीच्या काळात राम मंदिरासाठी कोणीही पुढे येऊन जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. अशा काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विहिंपचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस तसेच महंत अवैद्यनाथ या चौघांनी जनजागृतीद्वारे अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी वातावरण निर्मिती केली. त्यामुळे त्यांचा भारतरत्न देऊन सन्मान करण्यात यावा, अशी मागणी तोगडीया यांनी केली.

अयोध्येत राम मंदिर होत आहे ही स्वागतार्ह बाब आहे. पण, आज रामाच्या नावावर सत्तेत आलेले रामराज्य विसरले आहेत, अशा शब्दांत तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, "केंद्रातील सत्ताधारी रामामुळेच सत्तेत आले आहेत. मात्र, आता ते रामराज्य विसरले आहे. भारताला अमेरिका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला भारतात रामराज्य हवे आहे. आर्थिक विकासाच्या नावाखाली हिंदुंचा बळी दिला जात आहे. मुठभर भांडवलशहांच्या हातात संपत्ती एकवटली जात आहे तर गरीब आणखी गरीब हात आहे. बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी चुकीचा मार्ग निवडला आहे. रामराज्यात हे अपेक्षित नव्हतं"

भारतीय लोकसंख्येमध्ये असंतुलन निर्माण होत असून विशेषत: हिंदुंच्या लोकसंख्येत ते प्रकर्षानं जाणवतंय. विविध धर्मांतील लोकांचा जन्मदर वेगवेगळा आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घालण्यावर बंदी आणणारा कायदा आणवा, अशी मागणीही यावेळी प्रवीण तोगडीया यांनी केली. केंद्रानं प्रकाशित केलेल्या जन्मदर वृद्धी अहवालाचा उल्लेख करताना यामध्ये हिंदूंचा जन्मदर २ टक्क्यांवर स्थिरावल्याचं तोगडिया म्हणाले. ही बाब अशीच सुरु राहिली तर १४० कोटींवरून हिंदुंची लोकसंख्या १०० कोटींवर यायला वेळ लागणार नाही, असा दावाही तोगडिया यांनी केला. मुस्लिमांचा जन्मदर २.५० टक्के असून याच वेगाने त्यांची लोकसंख्या वाढत राहिली तर भारत इस्लामिक स्टेट व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही यावेळी तोगडीया यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

बापरे! अमीषा पटेलच्या आईच्या घरातून डायमंड डायमंडचे दागिने चोरीला; घरातील हाऊस हेल्पला अटक

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

SCROLL FOR NEXT