bailgadi.jpeg 
नागपूर

खिल्ल्याऱ्या बैलांची गाडी गेली चक्‍क न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावत आठ आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. व्यवसायाने शेतकरी असलेले गजेंद्र चाचरकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सविस्तर वाचा - कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पोलीसांचा उरला नाही धाक

याचिकाकर्त्यानुसार, बैलगाडी शर्यत राज्याची संस्कृती आहे. मात्र, निराधार गोष्टींच्या आधारावर बैलगाडी शर्यतींना परवानगी नाकारल्या जात आहे. 2011 मध्ये लागू असलेल्या अधिसूचनेमुळे सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींना बेकायदेशीर ठरवले होते. त्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने अजय मराठे यांच्या प्रकरणात समान निर्णय दिला होता. त्यानंतर, केंद्र सरकारने 7 जानेवारी 2016 रोजी नवीन अधिसूचना जारी करून जिल्हाधिकारी हे बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी देऊ शकतात, असे स्पष्ट केले. परिणामी, 2011 मधील अधिसूचना निष्प्रभ झाली. तसेच, राज्यातील संबंधित नियमानुसार आवश्‍यक काळजी घेऊन बैलगाडी शर्यत आयोजित करता येते. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांद्वारे बैलगाडी शर्यतींना परवानगी नाकारल्या जात आहे. ही कृती अवैध आहे. बैलगाडी शर्यतींना प्रोत्साहन दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था भरभराटीस येऊ शकते, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत प्रतिवादींना नोटीस बजावत आठ आठवड्यांत यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. अश्विन इंगोले यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT