Nagpur News esakal
नागपूर

Nagpur News : भूमाफियांविरोधातील नऊ प्रकरणात गुन्हे दाखल

२१ प्रकरण प्रक्रियेत ः पोलिस आयुक्तांच्या दरबारी २७५ तक्रारी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर ः गेल्या काही वर्षांमध्ये शहरात भूमाफिया सक्रीय झाले असून त्यांच्या माध्यमातून जमिनी बळकावणे, अतिक्रमण करणे आणि बनावट दस्तऐवजांच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केल्या जाते. अशा फसवणूक होणाऱ्या २७५ नागरिकांनी दस्तऐवजासोबत पोलिस आयुक्तांच्या जनता दरबारात भेट देत गाऱ्हाणे मांडले. त्यापैकी ९ तक्रारीवर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून २१ प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली.

शहरात सातत्याने भूमाफियांचा वावर वाढल्याने ठाण्यात त्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात येतात. मात्र, अनेकदा त्या तक्रारीवर निश्‍चित कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे अनेकजण न्यायापासून वंचित राहतात. अशा वंचित नागरिकांसाठी पोलिस आयुक्तांनी सोमवारी (ता.१५) सकाळी अकरा वाजतापासून जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी पोलिस सहआयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त पोलिस (गुन्हे) आयुक्त संजय पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण विभाग) शिवाजी राठोड, पोलिस उपायुक्त (गुन्हे) निमित गोयल यांच्यासह सर्व शाखेच्या परिमंडळातील उपायुक्तांचे वाचक आणि पोलिस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले होते.

जनता दरबारात शहरातील पाचही परिमंडळातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २७५ नागरिकांनी तक्रारी नोंदविण्यात आल्यात. त्यामध्ये जवळपास ९ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय २१ प्रकरणात प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, अनेक तक्रारीमध्ये पोलिसांकडून तपास करण्यात आला असल्याची माहिती समोर आली तर काही प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचेही दिसून आल्याचीही माहिती त्यांनी दिली.

परिमंडळ चारमध्ये सर्वाधिक तक्रारी

पोलिस आयुक्तांच्या जनता दरबारात परिमंडळ १ ते ५ मधील तक्रारदारांची चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वाधिक १०६ तक्रारी या परिमंडळ चारमधून आल्याचे दिसून आले. वाठोडा, अजनी, हुडकेश्‍वर, नंदनवन आणि बेलतरोडी यासारख्या पोलिस ठाण्याचा समावेश आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात भूखंडाची प्रकरणे असल्याने तिथे भूमाफीया सक्रीय आहे. याशिवाय परिमंडळ तीनमध्ये सर्वात कमी १७ तक्रारी आल्याचे दिसले. यावेळी ३० जणांच्या अर्जावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचेही आदेश पोलिस आयुक्तांनी दिले.

आयुक्त घेणार आढावा

पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या जनता दरबारात भूमाफियांविरोधात तक्रारींचा पाऊस पडल्याचे दिसून आले. यावेळी या तक्रारीवरून पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले. मात्र, आता या आदेशानंतर त्या प्रकरणात पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली त्याचा आढावा पोलिस आयुक्त महिन्याभरात घेणार आहेत. त्याप्रमाणे कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचेही संकेत त्यांनी दिले.

अशा आहेत तक्रारी

परिमंडळ - १ - ३२

परिमंडळ - २ - ६३

परिमंडळ - ३ - १७

परिमंडळ - ४ - १०६

परिमंडळ - ५ - ३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT